मंत्री उदय सामंत यांची बोचरी टीका , निष्ठावंतांचा लवकरच भांडाफोड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या ओंजळीने पाणी पितात, अशी टीका अनंत गीते यांनी केली होत़ी तर आदित्यजींची व उद्धव ठाकरेंची नक्कल करणारे स्वतःला निष्ठावान असल्याचे सांगत फिरत आहेत़ त्यामुळे आदित्यजींच्या निष्ठा यात्रा सभेतील तथाकथित निष्ठावंतांची निष्ठा तपासून पाहण्याची गरज आहे, अशी बोचरी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल़ी
रत्नागिरी दौऱयावर आलेल्या मंत्री सामंत यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप केल़ा यावेळी सामंत यांनी सांगितले की, आदित्य ठाकरेंच्या यापूर्वी मोठय़ा सभा रत्नागिरीत झाल्या आहेत़ मात्र शुक्रवारी रत्नागिरीत कॉर्नर सभा घेऊन आदित्यजींना छेटे करण्याचे काम झाल़े सभेला अन्य ठिकाणाहून गर्दी जमवण्यात आली होत़ी खरे शिवसैनिक हे आपल्यासोबत आहेत, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितल़े
आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, शिवसेनेत आता कोण बोलायला शिल्लक नसल्याने भास्कर जाधव यांना बोलावले जात आह़े दुसऱयांना शिवीगाळ करून स्वतःचा पक्ष मोठा होत नसत़ो दुसऱयांना गद्दार म्हणणाऱयांनी गद्दारीच्या व्याख्या एकदा स्पष्ट करून सांगितली पाहिज़े लवकरच आपण स्वतःला निष्ठावान म्हणविणाऱयांचा भांडाफोड करणार आहे, असे सामंत यांनी सांगितल़े
वेदांत–फॉस्कॉनबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार
वेदांत-फॉस्कॉन प्रकल्प दुसऱया राज्यात गेल्यामुळे विरोधक टीका करत आहेत़ प्रकल्प दुसऱया राज्यात कशामुळे गेला, कुणी 10 टक्क्यांची मागणी केली होत़ी पूर्वीच्या उद्योगमंत्र्यांनी काय केले, या संदर्भात निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार, असा इशारा मंत्री सामंत यांनी दिल़ा
वेदांत हवा, मात्र रिफायनरी प्रकल्पाला विरोध
वेदांत-फॉस्कॉन प्रकल्प गेल्याचे दुःख व्यक्त करणाऱयांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली आह़े स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरीचे समर्थन करत आहेत़ तर खासदार विनायक राऊत यांनी विरोधाची भूमिका घेतली आह़े त्यामुळे त्यांनी आधी एकमत करून स्थानिकांच्या रोजगाराचा विचार करावा, असा टोला सामंत यांनी लगावल़ा
पंचतारांकित एमआयडीसीला शेतकऱयांसाठी विरोध
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे पंचतारांकित एमआयडीसीला स्थानिक शेतकऱयांच्या भूमिका लक्षात घेऊन त्यावेळी आपण विरोध केला होत़ा आता अनेक उद्योsग रत्नागिरी जिह्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आह़े तसेच स्टरलाईट कंपनीच्या जागेसंदर्भात देखील लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.