उपनगरातील चित्र : सुविधा देण्यात प्रशासन अपयशी : रस्ते, गटर, ड्रेनिज, कचरा उठाव, पाणी टंचाईचा, प्रश्न
इम्रान गवंडी/कोल्हापूर
शहराची हद्दवाढ रखडली तसेच भोवताली असलेल्या पंचगंगा नदीच्या वेढय़ामुळे शहर वाढीला मर्यादा आल्या. परिणामी उपलब्ध जागेत शहर आणि उपनगराची वाढ झाली. वाढत्या नागरिकरणाचे प्रश्न आता आ वासून पुढे टाकले आहेत. कचरा उठाव, रस्त्यांची दुरुस्ती, नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा अशा अनेक समस्यांनी उपनगरांना वेढले आहे. शहरा भोवतालच्या कॉलन्यांची ही विदारकता बदलण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर प्रामाणिकपणे प्रयत्न होण्याची गरज आहे. उपनगरांचा विस्तार वाढत आहे पण मुलभूत सुविधा पुरविण्यास प्रशासन तोकडे पडत आसल्याचे दिसून येत आहे.
पाणी टंचाई मिटणार कधी?
आर. के. नगर, राजेंद नगर, पाचगाव, मोरेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, बापट कँप, फुलेवाडी परीसर, साळोखे नगर, जीवबानाना जाधव पार्क, राजोपाध्येनगर, साई प्रसाद काŸलनी, राजेसंभाजी नगर, यासह उपनगरातील अनेक ठिकाणी रात्री उशिरा तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आसल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार कधी? असा प्रश्न येथील नागरीक करत आहेत.
नवीन वसाहती झाल्या पण, रस्तेच नाहीत
आपटेनगर, जीवबानाना जाधव पार्क, फुलेवाडी रिंगरोड, क्रांतीसिंह नाना पाटील, बोंद्रे नगर, बालावधूत नगर, नृसिंह काŸलनी, पुईखडी आदी भागात नविन काŸलन्या वाढल्या पण येथे रस्तेच नसल्याचे दिसुन येते. काही ठिकाणी रस्ते आहेत पण त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर मुरूम व माती टाकल्यामुळे पक्क्या रस्त्यांची वाणवा आहे. पावसाळय़ात तर या रस्त्यावर दलदलीचे साम्राज्य निर्माण होत आसल्यामुळे नागरिकांना चालतानाही कसरत करावी लागत आहे. दरवर्षी पावसाळय़ात नवीन केलेले रस्त्यावरचे डांबर निघून फक्त खडीच शिल्लक राहते. व यातून नागरीकांना खडतर प्रवास करावा लागतो.
भटक्या कुत्र्यांची दहशत
उपनगरातील गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांच्या झुंडच्याझुंड पहावयास मिळत आहेत. लहान मुलांना घराबाहेर पडणेही भितीदायक ठरत आहे. भटकी कुत्री कधी अंगावर धावून येतील याचा काही नेम नसतो. काही वेळेस अक्रमक झालेली भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुले जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळय़ा दगावल्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
एलईडीची संख्या कमी, परिसरात अंधार
उपनगरामध्ये सोडीयमचे दिवे काढल्यानंतर एलईडीचे दिवे बसविले आहेत. मात्र, दोन विद्युत खांबातील अंतर जास्त असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडलेला नसतो. उपनगरामध्ये रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोरीचे प्रकारही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे विशेष करून उपनगरात एलईडी दिवे असणाऱ्या विद्युत खांबाची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
कंटेनर हटविण्यास घाई, कचरा उठावास दिरंगाई
कोल्हापूर महापालिकेने शहर कोंडाळामुक्त करण्यासाठी कंटेनर हटविले आहेत. टिपरमधून कचरा उठाव सुरू केला आहे. कंटेनर काढले मात्र, टिपर वेळेवर येत नसल्याने कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. त्यामुळे उपनगरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा कचऱयाचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी टिपरचालक व नागरिक यांच्यात वादावादी होत आहे. टिपर चालकाकडून आरेरावीची भाषा वापरली जात आसल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. एक तर टिपर नियमित येत नाही, आणि आलाच तर जादा वेळ थांबत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावरून चालनेही मुश्किल
कॉलनी स्थापन होऊन 25 वर्षे होत आली पण अजूनही येथे रस्ता झालेला नाही. रस्त्यावर फक्त मुरूम माती टाकून तात्पूर्ती मलमपट्टी केली जाते. पक्के रस्ते नसल्यामुळे पावसाळय़ात रस्त्यावर दलदल निर्माण होऊन चालतानाही कसरत करावी लागते. सुशिला सावंत (रा. राजेसंभाजी नगर)
घंटागाडी नियमित येत नाही
रोजच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. रात्री उशीरा पाणी पुरवठा होता, त्यातच कमी दाबाने पुरवठा होत आसल्याने पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. घंटागाडी चार-चार दिवस येत नसल्याने कचरा साठून राहतो. परिणामी कचरा उघडय़ावर टाकावा जातो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.- कल्पना जाधव (रा. कणेरकर नगर)
आयुक्तांना निवेदने देवूनही दुर्लक्ष
ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्याने मैलश्रित पाणी उघडय़ावर वाहत आसल्यामुळे परिसरात दुर्गंधी बरोबरच ढासांचा प्रचंड प्रादूर्भाव वाढला आहे. काŸलनीत अंतर्गत रस्ते तर नाहीच तसेच गटरही नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहते. रस्ते, गटर, ड्रेनेज, पाणी टंचाई या बाबत आयुक्तांना निवेदन देवूनही याची दखल घेतलेली नाही.- विद्या चव्हाण (रा. साईप्रसाद कॉलनी)
अतिक्रमणामुळे युटिलीटीचा प्रश्न गंभीर
राजेंद्रनगर झोपडपट्टीत अनधिकृत झोपडय़ांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यामध्येच झोपडय़ा उभारल्या आहेत. यामुळे या रस्त्यातून पिण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईनची सुविधा पुरवणे मुश्किल होत आहे. सद्या अमृत योजनेतील कामाला यामुळे अडथळा निर्माण होत आहे. तर अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका जाण्यासाठी सुध्दा अडचण होत आहे.
राजू शिवशरण, नागरिक, राजेंद्रनगर