संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड असल्याचा आरोप करून अडीच वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या ५५ आमदारांना शरद पवारांच्या झोळीत टाकल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या सर्व आमदारांसोबत आयोध्येला गेल्यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली होती. त्याला त्याला उत्तर देताना ते ते आज टिव्ही 9 या वृत्तवाहीनीबरोबर संवाद साधला.
आपल्या आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी काही गुंडांना नेल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावेळी बोलताना त्यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले असून अयोध्यानगरीत प्रभू रामाच्या दर्शनाला गेले होते कि शक्तीप्रदर्शन करायला?” असा सवाल राऊतांनी विचारला. तसेच एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार या दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे यातील एक गट नाराज असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिंदे गटाचे स्टार आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टिका करून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले. “महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड म्हणून संजय राऊतांचं नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी अडीच वर्षापूर्वी गुंडगिरी आणि मोठी चोरी केली. शिवसेनेचे ५५ आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हाला कळालही नाही. हा माणूस खरा गुंड आहे. हा माणूस खरा चोर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चोर म्हणायचं काहीही कारण नाही. चोरी त्यांनीच केली होती. आधी भाजपा-शिवसेनेची युती होती, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. पण रातोरात काळंबेर करून सगळं बिघडून टाकलं.” अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.