प्रतिनिधी /बेळगाव
कृषी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे देशभरातील तज्ञांशी चर्चा करीत आहेत. याच धर्तीवर गुडेवाडी ता. चंदगडचे सुपूत्र व आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील यांना चर्चेसाठी दिल्ली येथे बोलाविण्यात आले होते.
सहकारातून ग्रामीण भाग समृद्ध करून भारताला कृषी क्षेत्रात महासत्ता बनविण्यासाठी अमित शहा प्रयत्न करीत असल्याची भावना डॉ. पाटील यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, शहा यांनी गांभीर्याने अनेक समस्या जाणून घेतल्या. सहकार व कृषी क्षेत्राचा विकास व विस्तारासाठी काही धोरणात्मक बदल पाटील यांनी सरकारला सुचविले आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करू असे आश्वासन शहा यांनी दिले. मोदी सरकारच्या कृषी, अर्थकारण, सहकार क्षेत्रातील लक्षणीय योजनांमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुडेवाडीचे सुपूत्र असलेले डॉ. परशराम पाटील हे आशियाई विकास बँक, युनायटेड नेशन्स, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार इत्यादी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करणारे कृषी अर्थ शास्त्रज्ञ आहेत. सध्या ते नेहरू मेमोरियल लायब्ररी या प्रति÷ित संस्थेचे फेलो आहेत. त्यांचे वडील जक्काप्पा व आई कमल यांच्यामुळे हे यश मिळाल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.
आरबीआयचे संचालक व सहकार अर्थशास्त्रज्ञ सतीश मराठे, ज्ये÷ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आयसीसीएसआरचे संचालक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आयएएस अधिकारी डॉ. श्रीकांत परदेशी, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, माजी खासदार प्रभाकर कोरे, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डी. आर. गाडगीळ, सस्टेनेबल व्हिलेज सेंटरचे समन्वयक डॉ. कैलास बवले, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे मार्गदर्शन मिळत आहे.