बेळगाव प्रतिनिधी – ऐन दिवाळीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आले आहे. सोमवारी नरक चतुर्दशी झाली आणि मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आले. मंगळवारी बेळगावची बाजारपेठ पूर्णपणे खुली असते. शिवाय दिवाळीमध्ये तर सुट्टी रद्द करून व्यापारी विक्रेते दुकानदार आपले व्यवसाय सुरू ठेवतात. कोरोनाच्या कारणास्तव गेले दोन वर्षे सार्वजनिक स्वरूपात उत्सव करण्यावर निर्बंध आले होते. पण आता दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच सूर्य ग्रहणामुळे उत्साहाला खंड पडला आहे ग्रहणात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. खरेदी केली जात नाही या कारणामुळेच मंगळवारी बेळगावची बाजारपेठ मोकळी झाली आहे. सायंकाळी सहा नंतर ग्रहण काल संपल्यानंतर दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे.
Trending
- घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !
- आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
- काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा
- टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या
- मन आणि तनही भाजपमय !
- गोवा डेअरीच्या 14 संचालकांची अपात्रता कायम
- अब की बार…मोदी हद्दपार! संजयबाबा घाटगेंचा खरमरीत इशारा