Tarun Bharat

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम

दिल्ली प्रतिनिधी :
भारतीय हवाई दलाने रविवारी आसाममधील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवले. हवाई दलाने लोकांना मदत साहित्य पुरवले. रेल्वे स्थानकावर अडकलेल्या ११९ प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय हवाई दलाने शनिवारी एक AN-32 वाहतूक विमान, दोन Mi-17 हेलिकॉप्टर, एक चिनूक हेलिकॉप्टर आणि एक ALH ध्रुव तैनात केले.


भारतीय वायुसेनेने पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत मदत सामग्री आणि लोकांना विमानाने पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी IAF ने आपली वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. आसाममधील पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे २० जवान तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य सरकार संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि NDRF यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने पुरात अडकलेल्या एकूण 24,749 लोकांची सुटका केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुराच्या पहिल्या टप्प्यात 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 100,732.43 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

Related Stories

इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला भीषण आग

datta jadhav

ऑलिम्पिकमधील यशातून प्रेरणा घ्या!

Patil_p

रस्त्याची कामे भ्रष्टाचार मुक्त अन् दर्जेदार झाली पाहिजेत : गडकरी

datta jadhav

देशात तांत्रिक मंदी : आरबीआय

Patil_p

‘जी-20’ नियोजनासाठी आज सर्वपक्षीय बैठक

Patil_p

विदेशी प्रसारमाध्यमांकडून ममतांचे कौतुक

Patil_p