नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल-फर्स्टच्या अर्थव्यवस्थेला समर्थन देण्यासाठी भारती एअरटेल कंपनीने आपल्या शक्तिशाली नेटवर्कसोबत देशामध्ये 5-जी नेटवर्क आणण्यासाठी सर्वात पुढे आमची कंपनी राहणार असल्याचा विश्वास अध्यक्ष सुनील मित्तल यावेळी व्यक्त केला आहे. देशामध्ये 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव आगामी दिवसांमध्ये होणार असून या विषयावर महत्वपूर्ण टिप्पणी मित्तल यांनी केली आहे.
5-जी स्पेक्ट्रमच्या लिलावास 26 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. यामध्ये कमीत कमी 4.3 लाख कोटी रुपयाच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव ठेवण्यात येणार आहे. यासाठी या अगोदर शुक्रवार व शनिवारी मॉकड्रिलचे आयोजन करणार आहे.
प्रतिस्पर्धेच्या अगोदर एअरटेलने नेटवर्क परिक्षणासाठी 5-जी क्षेत्रात आपले स्थान प्राप्त केले होते. या अगोदर भारतामध्ये 5-जी क्षेत्रात क्लाउड गेमिंगच्या अनुभवाचे प्रदर्शन केले आणि ग्रामिण कनेक्टिविटीसाठी 700 मेगाहर्ट्जच्या ब्रँडचे परिक्षण करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.