महान क्रांतिकारक क्रांतिवीर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती लढा, सहकार, शिक्षण आणि समतेच्या राजकारणाचे अग्रणी, परिवर्तनवादी आंदोलनांचे आधारस्तंभ नागनाथअण्णा, लाखो जनसामान्यांच्या मनात मृत्युपश्चातही स्थान बाळगून आहेत. 1942 ला नाना पाटलांनी क्रांतिकारी मार्गाने देश स्वतंत्र करायचा निर्णय घेतला आणि शिक्षण सोडून अण्णा सामील झाले. क्रांतिसिंहांच्या प्रेरक विचारांनी घडलेली प्रतिसरकारची चळवळ निरा ते वारणा नद्यांच्या खोऱयातील जनसामान्यात रुजवण्याचे काम कुंडलमध्ये जी. डी. बापू आणि नाथाजी लाड, वाईतून किसान वीर सांगलीतून वसंतदादा पाटील, बिळाशी शिराळय़ातून बाबुराव चरणकर, बर्डेगुरूजी, बाबूजी पाटणकर, पांडू मास्तर, शेख काका तर वाळव्यातून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी जोमाने केले. ग्राम राज्य, प्रतिसरकार, सावकारी कर्जातून मुक्ती, बळकावलेल्या जमिनी परत करणे, गावगुंडांचा बंदोबस्त, मुलींचे नांदणे लावणे, न्यायदान मंडळे चालवणे, गद्दार व जमिनी जप्त करणाऱया सरकारी अधिकाऱयांना पत्री ठोकून वाळवा आणि कुंडलच्या ग्रुपने प्रतिसरकारला इंग्लंडच्या संसदेपर्यंत पोहोचवले. हजारो क्रांतिकारक बनताहेत, गोव्यातून शस्त्रे मिळतील. मात्र त्यासाठी पैसा आणि लष्करी शिक्षण पाहिजे. म्हणून पे टेन, पोस्ट थैली लुटणे आणि कळस म्हणजे खान्देशात जाऊन धुळय़ाचा साडेपाच लाखाचा सरकारी खजाना लुटणे अशी धाडसी कामगिरी त्यांनी केली. ठिकठिकाणी लष्करी छावण्या, पोलीस गोळीबार, पोलिसांनी भडकावलेल्यांचे हल्ले परतवत ते पाच वर्षे तगून राहिले. बंगालच्या क्रांतिकारकांना चिरडून टाकलेल्या डीएसपी गिल्बर्टला इंग्रजांनी साताऱयात पाठवले. त्याने उच्छाद मांडला. नागनाथ अण्णांच्या आई, वडील भावाला तुरुंगात डांबले. पण अण्णांनी दिल्लीतून आझाद हिंद सेनेच्या नानकसिंग, मन्सासिंग या पंजाबी सैनिकांना प्रशिक्षक म्हणून आजच्या कोयना, वारणा धरणांच्या पट्टय़ातील जंगलात आणले. गोव्यातून अत्याधुनिक मशीन गन्स, लांब पल्ल्याच्या रायफली पिस्तुले मिळवली आणि इंग्रज सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिले. खान्देशातील आणि आजच्या गुजरातमधील डांग जिह्यात लपवलेल्या पैशाच्या पोत्यांना आदिवासींनी कधी हात लावला नाही की लोक पकडून दिले नाहीत. कृष्णा, वारणा आणि भीमेच्या खोऱयापासून बेळगाव, गोव्यापर्यंतच्या सर्वसामान्यांनी आश्रय दिला. पोलीस पहारे, वेढे असताना स्वतःचा जीव धोक्मयात घालून क्रांतिकारकांना बाहेर काढले. या सामान्यांच्या निस्वार्थ बुद्धीचा प्रभाव अण्णांच्यावर आयुष्यभर राहिला. त्यात आई क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांची शिकवण, ‘पैशाचा ढीग एका बाजूला ठेवा अन् दुसऱया बाजूला माणूस ठेवा. दोघांना पण हाक द्या कोण येतंय बघा!’ त्यामुळेच नागनाथांच्या सदऱयाला कधी खिसा नव्हता. संस्थांच्या नफ्यातून त्यांनी अनेक परिवर्तनवादी आंदोलनांना, विद्रोही साहित्य, अंधश्रद्धा निर्मूलन अशा चळवळींना बळ दिले. ऊस उत्पादक शेतकऱयांना राज्यात पहिल्यांदा चार आकडी ऊस दर देण्याचा पराक्रम करून दाखवला. हयात असेपर्यंत अण्णा साखर सम्राटांचा दबाव झुगारून चढा दर देत. इतरांना नाईलाजाने का होईना दर द्यावा लागे. आपल्या संस्था सक्षम राखून त्यांनी कर्जमुक्त आणि फायद्यात ठेवल्या. पहिल्या साखर उत्पादनापासून कारखान्यात पाय ठेवणे बंद केले, भरल्या कुटुंबाचा त्याग करून आयुष्य हायस्कूलमध्ये काढले, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाळवा भेटीवेळी त्यांच्या आग्रहावरून एकदाच अण्णांनी घराचा उंबरा शिवला. अण्णांनी जसा हिंदू महासभा, जनसंघ, आरएसएस आणि भाजपला भारतीयत्व विरोधी शक्ती म्हणत तीव्र विरोध केला तसंच कम्युनिस्ट, काँग्रेस किंवा शेकापक्ष यापैकी कोणत्याही पक्षात ते सामील झाले नाहीत. गुरु क्रांतिसिंह नाना पाटील कम्युनिस्ट पक्षात गेले तरी तिथले नेते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रमाणे बहुजन समाजाच्या बाजूने जाऊ शकत नाहीत अशी अण्णांची स्पष्ट भूमिका होती. गांधींनंतर या पक्षांमध्ये समता शोधणारे नागनाथअण्णा हे दुसरे द्रष्टे! ते आमदारही स्वतंत्र उमेदवार म्हणून झाले. कांशीराम यांचा बसपाचा विचार त्यांना पटला. ते त्यांचे महाराष्ट्र, गोव्याचे प्रभारीही झाले. मात्र, मायावतींनी भाजपची मदत घेताच त्यांनी फोनवरूनच आपला राजीनामा कळवला. मुलायम सिंग आणि जनता दल यांच्याशी मुद्यांच्या आधारावरच त्यांचे जमले. दलित नेत्यांनी ऐक्मय करून निवडणूक लढवून पाच नेते खासदार होताच त्यांना त्यांनी पाच सुमो गाडय़ा देशभर फिरण्यासाठी पेट्रोल खर्चासह देऊ केल्या. क्रांतिकारक अण्णा स्वातंत्र्यानंतर रचनात्मक कार्यकर्ते झाले. महार वतननष्ट करणे, पारधी, नंदीवाले, ऊस तोडकऱयांच्या मुलांसाठी शाळा, वसतीगृहे, नोकऱया हे शाहू महाराजांचे धोरण त्यांनी पुढे नेले. महाराष्ट्राच्या विकासाला धरण आवश्यक आहे पण, धरणासाठी जमीन देणाऱया शेतकऱयाचे पुनर्वसनही गरजेचे आहे. स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना विकास सैनिक म्हणावे, धरण निर्णयात प्रकल्पग्रस्तांना सामाऊन घ्यावे, पानथळ जागी पुनर्वसन आणि योग्य मोबदल्यासाठी ते झटले. त्यामुळेच सातारा, सांगली जिह्यातील कोयना, वारणा, उरमोडी, धोम, कण्हेर, तारळी, कोल्हापूर जिह्यात काळमावाडी, आजरा, चंदगड, कागल तालुक्मयातील उचंडी, सर्पनाला, चित्री प्रकल्प, चंदगड मधील घटप्रभेवरील दोन मोठे प्रकल्प या सर्व भागातील शेतकरीवर्गाचे पुनर्वसन अण्णांनी आपल्या झटणाऱया सहकाऱयांच्या जोरावर घडवले. भीमेच्या खोऱयातील, माणदेशातील 13 दुष्काळी तालुक्मयांना ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांचे पाणी मिळण्यासाठी त्यांनी आटपाडीतून पाणी संघर्ष चळवळ उभी केली. आज पाण्याचा प्रश्न सुटून समन्यायी धोरण स्वीकारणे सरकारला भाग पडले आहे. कारखाना परिसरात तीन रुपयात पोटभर जेवण, तिथल्या झाडांना लागलेले आंबे घरोघर मोफत वाटून अवघ्या दोन आंब्याचे आठ भाग करून त्यातील आठवा हिस्सा तेवढाच स्वतः खायचा इतक्मया निरपेक्ष वृत्तीने अण्णा जगले. त्यांच्यासारखे जगणे आता शक्मय होईल का? असे अनेक जण विचारतात. तेव्हा, बंदुकीच्या गोळी समोर निशाण्यावर उभे अण्णा दिसतात. त्या प्रश्नाचे उत्तर अण्णांचे अजरामर चरित्रच देऊ शकेल.
Previous Articleआता भारतीय महिलाही पॉवरफुल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.