ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. देशाचे सैन्य उत्तम पद्धतीने तयार करणे हा अग्निपथ योजनेचा उद्देश आहे. हेच देशाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट करत जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीच्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे आता अग्निपथ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशभरात विविध ठिकाणी अग्निपथ योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केली होती. आज या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी देशाचे सैन्य उत्तम पद्धतीने तयार करणे हा अग्निपथ योजनेचा उद्देश आहे. हेच देशाच्या हिताचे असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने अग्निपथ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या.
अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल; हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल