ऑनलाईन टिम नवी दिल्ली
दक्षिण आशियाई राष्ट्रात विशेषत: पाकिस्तानात अतिवृष्टीने आतापर्यंत सुमारे १००० लोकांचा मृत्यु झाले आहे. तर ३० दशलक्षाहून अधिक लोकांचे जीवनमान प्रभावित झाले आहे. या विनाशकारी पुरामुळे पाकिस्तान सरकारने “राष्ट्रीय आणीबाणी” घोषित केली आहे.
जूनच्या मध्यापासून ३४३ लहान मुलांसह किमान ९३७ लोक मरण पावले असल्याची महिती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) ने दिली आहे. २०१० च्या विनाशकारी पुरानंतर प्रथमच बलुचिस्तानच्या नैऋत्य प्रांताचा बराच मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या बळींमध्ये निम्म्याहून अधिक हे बलुचिस्तान आणि दक्षिण सिंध प्रांतातील आहेत. या प्रांतामध्ये जवळजवळ ५ लक्ष घरे प्रभावित झाली असून आतापर्यंत अनुक्रमे २४३आणि ३०६ लोक मरण पावले आहेत.