ऑनलाईन टीम/तरुण भारत :
अमरनाथ यात्रेमध्ये यंदा 6 ते 8 लाख यात्रेकरू सहभागी होतील असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. अमरनाथ यात्रेच्या इतिहासात ही संख्या सर्वाधिक असू शकते. इकॉनॉमिक टाईम्सने अधिकार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, यूएस-निर्मित कॅनिक-टीपी 9 यासह पिस्तुलांची मोठी खेप खोऱ्यातील विविध भागात तस्करी करण्यात आली आहे आणि दहशत निर्माण करणे हा उद्देश्य त्यापाठीमागे आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा हवाला देत वृत्तपत्राने असे लिहिले आहे की अल्पसंख्याक समुदाय, ऑफ-ड्युटी पोलिस आणि सोशल मीडिया सेलिब्रिटींवरील हल्ले अतिरेक्यांना “खोऱ्यातील शांतता” या सरकारच्या घोषणेवर प्रभाव पाडण्यास मदत करत आहे.
वृत्तपत्रानुसार, सुरक्षा दलांनी यावर्षी 94 हून अधिक अतिरेक्यांना ठार केले आहे. याशिवाय अनेक जहाल नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान 17 सामान्य लोकांचाही मृत्यू झाला आहे.