ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
अमरनाथ यात्रा सुरू होण्यासाठी एक दिवस बाकी असताना जम्मू-काश्मीरमध्ये उच्चस्तरीय सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी तीन-स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या सुरक्षेमुळे दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील या मार्गावरील यात्रेकरुंची यात्रा सुनिश्चित होणार आहे.
ही यात्रा सुरक्षितपणे आणि विना अडथळ्यांची पार पडावी यासाठी वरिष्ठ अधिकारी सलग बैठका घेत आहेत. यात्रेच्या आयोजकांना देशभरातून सुमारे 7-8 लाख यात्रेकरू येण्याची अंदाज आहे.
काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी यात्रामार्गावरील परिस्थितींचा आढावा घेतला. अमरनाथ येथिल पवित्र गुहा आणि पंजतरणी येथिल यात्री कॅम्पला भेट देऊन आवश्यत त्या सुचना दिल्या.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आयजीपीने आर्मी, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, जेकेपी, एनडीआरएफ आणि नागरी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठक घेतल्यानंतर, अतिरिक्त तैनातीसाठी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. विना अडथळा सुरळीत यात्रा पार पाडण्यासाठी योग्य समन्वय आणि संयुक्तिक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत,”