अमरनाथ
शुक्रवारी घडलेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर सध्या अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पवित्र गुहेजवळील बचावकार्य आणि मार्गाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच प्रवास सुरू होईल. प्रशासनाने शुक्रवारी रात्रीच यात्रा पुढे ढकलली होती. पहलगाम आणि बालटाल येथील बेस कॅम्पच्या पलीकडे कोणत्याही भाविकाला परवानगी देण्यात येत नव्हती. शनिवारी सकाळी बेस कॅम्पबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यात्रा पुन्हा कधी सुरू होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती, मात्र प्रशासनाकडून माहिती मिळू शकली नाही.
शुक्रवारी पवित्र गुहेजवळ गर्दी होऊनही अमरनाथ यात्रेला जाणाऱया यात्रेकरूंचे धैर्य कमी झालेले नाही. शुक्रवारी उशिरा जम्मू बेस कॅम्पमधून यात्रेकरुंचा एक जथ्था काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाला. जम्मूतील यात्रेकरुंची 279 वाहने ताफ्यात रवाना करण्यात आली. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला प्रशासनाचा ढिसाळ कारभार असल्याचे म्हटले आहे. जम्मूतील भगवतीपूर बेस कॅम्पवर यात्रेकरुंची संख्या वाढली होती. त्यामुळे यात्रा स्थगित करूनही यात्रेकरुंना बालटाल आणि पहलगामला पाठवण्यात आले.