प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. सुमारे 5 ते 7 मिनिटे या दोन नेत्यांदरम्यान चर्चा झाली. गोव्यातील लोकसभेच्या दोन पैकी दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे. जनतेने केलेले मतदान हे भाजपच्या दिशेने आहे, असा अंदाजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता सल्ला दिला हे समजले नाही.
मात्र मुख्यमंत्र्यांना केंद्रिय गृहमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे चर्चा रंगात आली. अमित शहा हे अनेक वेळा डॉ. प्रमोद सावंत यांना फोन करीत असतात. मात्र यावेळी त्यांनी एकंदरित राजकीय आढावा घेतला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता आमची नियमित चर्चा झाल्याचे ते म्हणाले.