प्रतिनिधी /बेळगाव
अल्पावधीत अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित’च्या अमृतधन मुदतठेव व धनसागर रिकरिंग ठेव या दोन्ही योजनांना मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहून ठेवीदारांची निराशा टाळण्याकरिता सदर दोन्ही योजनांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता या योजना 31 मे 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतील. गुंतवणूकदारांसाठी ही एक आनंदवार्ता असून या वाढीव मुदतीचा त्यांना लाभ घेता येईल.
ठेवीदारांना आता 31 मे 2022 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल. ‘अमृतधन’ योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना एक लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यात सव्वा लाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक रुपये 10,000 व त्या पटीत करता येईल.
याचप्रमाणे धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दर महिन्याला किमान 600 रुपये 5 वर्षे 3 महिने भरल्यास 50,000 परतावा मिळेल. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव फोन- 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.