दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरातला सर्वाधिक धोका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर विभागाने मोठा दहशतवादी अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मुंबई आदी ठिकाणांना सर्वाधिक दहशतवादी धोक्मयाचा इशारा दिला आहे. देशातील व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नेत्यांवर लून वुल्फ (एकाकी) हल्ल्याचा धोका असून त्याबाबत अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याची गरज असल्याचेही गुप्तचर विभागाच्या अलर्टमध्ये म्हटले आहे.
अल कायदा या दहशतवादी संघटनेने आपल्या अधिकृत चॅनल एएस साहब मीडियावर एक नोट जारी करत गुजरात, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही परिस्थितीत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी तयार रहा, असे निर्देश आपल्या सदस्यांना दिले आहेत. दुसरीकडे, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपल्या सर्व कॅडर स्लीपर सेलला टेलिग्रामद्वारे संदेश जारी करून एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. हल्ल्यावेळी ‘मरा किंवा मारा’ ही रणनीती अवलंबावी, अशी दर्पोक्तीही देण्यात आली आहे. या धमक्या आणि इशाऱयांच्या पार्श्वभूमीवर केवळ लष्कर किंवा पोलीसच नाही तर देशभरातील सर्व यंत्रणांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
शीख दहशतवादी गट सक्रिय
पाकिस्तानातील काही शीख दहशतवादी गट एकत्र आले आहेत आणि हे गट पाकिस्तानमधूनच इतर देशांमध्ये उपस्थित असलेल्या शीख दहशतवादी गटांना एकत्र करून मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर विभागाच्या अत्यंत संवेदनशील इशाऱयात सांगण्यात आले आहे. अलर्टनुसार, पाकिस्तानस्थित शीख दहशतवादी गट खलिस्तान पंजाबमध्ये मोठी दहशतवादी घटना घडवण्याच्या तयारीत आहे. या संघटनेने शस्त्रे आणि स्फोटके सीमेपलीकडून पंजाब आणि इतर भागात पाठवण्यास सुरुवात केली आहे.