बेळगाव प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला . निवृत्त झालेले व्यक्तींना तातडीने पेन्शन सुरू करावी, महागाई भत्ता द्यावा, एल. के. जी. यु. के. जी. अंगणवाडीला जोडून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. निवडणूक काळात आमच्याकडून काम करून घेतले जाते मात्र भत्ता दिला जात नाही. याचबरोबर मोबाईल व रिचार्ज देण्यात येत नाही. त्यामुळे फटका बसत आहे. तेव्हा तातडीने या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू ,असा इशारा देऊन महसूल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वकील नागेश सातेरी, सुजाता बेळगावकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.