पाणीही न घेण्याचा निर्धार
प्रतिनिधी /पणजी
गेल्या 44 दिवस उपोषण करणाऱया अंगणवड़ी स]िवकांनी आता पाणीही न घेण्याचा निर्धार केला असून मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही. सरकार आमच्या मरणाची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एका बाजूने सर्व सामान्य लोकांचे सरकार म्हणतात आणि दुसऱया बाजूने सामान्य लोक आपल्या रास्त मागणीसाठी आझामैदानावर उपोषण करीत आहे. सामान्य लोकांची काळजी नसलेले हे सरकार सामान्यांचे आहे काय असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे.
सुरुवातीला धरणे आंदोलन नंतर साखळी उपोषण आणि गेले पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकार विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र केवळ सहा अंगणवाडी सेविकांना परत सेवेत घेण्याबाबत विचारही करीत नाही. सेवेत यायचे असल्यास पुन्हा संप करणार नाही, संप केला ही आमची चुक आहे असे लिहून द्या अशा प्रकारच्या अटी घातल्या जात आहे. आम्हाला बिनशर्थ पुन्हा सेवेत घ्या अन्यथा उपोषण सुरुच रहाणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.
सुमारे 1 हजार 500 अंगणवाडी सेविकांनी विविध मागणीसाठी संप केला होता. सरकारने मागणी मान्य केल्या. नंतर काही दिवसांनी सात सेविकांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले. आंदोलन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सहकार्य घेतल्यामुळे सेवेतून कमी करण्याचे कारण दाखविण्यात आले आहे. वास्तविक 1 हजार 500 सेविकांनी संप केला होता मग केवळ सात जणांवर बडतर्फची पाळी का. शिवाय संप करताना आम्ही कुणाला बोलविले नव्हते किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला सांगितले नव्हते मग सरकार आमच्यावर खोटा आरोप करून ही कारवाई का केली. असेही सेविकांनी सांगितले.
गेल्या 15 दिवसांपासून अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करीत आहेत. एका बाजून भरमसाठ पाऊस आझाद मैदानावरील उघडय़ा जाग्यावर रात्र आणि दिवस बसलेल्या असून त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते दिवसेन दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र सरकारला आमची दया येत नाही काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली असल्याने रुग्णवाहीका आझादमैदानावर आली होती मात्र अंगणवाडी सेविकांनी काहीही घेण्यास नकार दिला.