मिरजोळे एमआयडीसी परिसरात गटारातून मोठ्या पमाणात सांडपाणी सोडले; ग्रामस्थांच्या विहीरी दूषित, पदूषण न रोखल्यास आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात गटाराला मोठ्या पमाणात कंपनीतील पदूषित सांडपाणी सोडण्यात आल्याने गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला. परिसरातील पिण्याच्या पाणी विहीरीही सांडपाण्यामुळे दुषित बनल्या आहेत. संतप्त ग्रामस्थांनी या पदूषणाचा रोख ओमेगा फिशमिल या कंपनीवर ठेवून कंपनीवर धडक दिली. पदूषण मंडळाच्या अधिकाऱयांना पाचारण करून कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारत येथील पदूषणाची वस्तुस्थिती दाखवून दिली.
मिरजोळे एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून येथील गटारातून सांडपाणी सोडले जात आहे. पण सद्या मोठ्या पमाणात सोडण्यात आलेले हे सांडपाणी थेट परिसरातील नाल्यातून रहिवाशी पित असलेल्या पाण्याच्या विहीरीत उतरले. त्यामुळे त्या सांडपाण्यामुळे विहीरी दूषित झालेल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप पसरला आहे. या सांडपाण्याच्या पदूषणाची बाब मिरजोळे ग्रामपंचायतीकडे मांडण्यात आली. त्यानंतर येथील ग्रामस्थ, ग्रा.पं.चे सदस्य यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीतून सांडपाणी सोडले जात असलेल्या पकल्पाकडे धडक दिली.
संतप्त ग्रामस्थांनी एमआयडीसीतील ओमेगा कंपनीकडे या सांडपाण्याच्या पदूषणाचा रोख ठेवला आहे. या कंपनीतून सांडपाणी सोडण्यात आल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्याबाबत रत्नागिरीतील पदूषण महामंडळाच्या अधिकाऱयांना या घटनास्थळी ग्रामस्थांनी पाचारण केले. पदूषण मंडळाच क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांची टिम या कंपनीच्या ठिकाणी दाखल झाली. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी या पाण्याचे पदुषण दाखवून दिले. या पदूषण पकरणी ओमेगा कंपनीच्या व्यवस्थापनालाही संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारत जोरदार खडसावले. मात्र या पदूषणपकरणी व्यवस्थापनकाकडून असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला होता.
त्यावेळी कंपनीबाहेर पडणाऱया सांडपाण्यामुळे झालेल्या पदुषण दाखवण्याचा आग्रह कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांना करण्यात आला. विहीरींच्या झालेल्या पदूषण पकरणी कंपनीने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही केली. संतप्त ग्रामस्थांचा पवित्रा पाहून कंपनीच्या अधिकाऱयांनी ग्रामस्थांच्या वस्तीकडे झालेल्या पदूषणाच्या पाहणीसाठी येण्यास नकार दर्शवला. पदूषण मंडळाचे अधिकारी अमित लाटे, ग्रामस्थ सुरेंद्र पाटील, सुरेंद्र कीर, वैभव पाटील, विजय देसाई, विकास सनगरे, वैभव जावकर, योगेश ठिक, तसेच ओमेगा कंपनीचे अधिकारी आशिष साळवी अशा उपस्थित साऱयांनीच पथम कंपनीच्या आवारातील सांडपाणी बाहेर पडणाऱया परिसराची पाहणी केली. त्यानंतर पदूषण मंडळाच्या अधिकाऱयांसमवेत ग्रामस्थांनी कंपनीबाहेर झालेल्या पदूषणाची पाहणी केली. कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी व ग्रामस्थांच्या विहीरीतील पाण्याचे नमुने पदूषण मंडळाच्या अधिकाऱयांनी घेतले. हे पाणी नमुने पुढील तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी सांगितले. कंपनीने या सांडपाण्याच्या पदूषणावर तातडीने पतिबंध करावा, अन्यथा तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे.