मुंबई प्रतिनिधी
परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले आरोप खोटे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असा अहवाल चांदीवाल आयोगाने ( chandiwal commission) दिला आहे. या आयोगाचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Home minister dilip walase-patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला. आयोगाच्य़ा या निकालामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने आपला अहवाल सादर करून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत असा निर्वाळा दिला.