लाखेंची उलाढाल थांबली : व्यापारी-विपेते अडचणीत : आजार आटोक्यात आल्यानंतरच बाजार सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात लम्पिस्कीन त्वचारोगाने धुमाकूळ घातल्याने जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव तालुक्मयातील मागील दोन आठवडय़ापासून जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. बाजार बंद राहिल्याने लाखेंची उलाढालही थांबली आहे. लम्पी आजार आटोक्मयात आल्यानंतर आणि प्रशासनाकडून आदेश आल्यानंतरच बाजार सुरू होणार आहेत.
एपीएमसी आणि हिरेबागेवाडी अशा दोन ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. मात्र लम्पिच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जनावरे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हय़ासह तालुक्मयातही लम्पिस्कीन रोगाची जनावरांना लागण झाली आहे. दरम्यान हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधित जनावरांपासून इतर जनावरांकडे तात्काळ फैलावतो. त्यामुळे जनावरांचे बाजार आणि शर्यती बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनावरांच्या बाजारातून होणारी लाखोंची उलाढालही थांबली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱया बाजारात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणतात. यामध्ये गाय, म्हैस आणि बैलांची संख्याही अधिक असते. विशेषतः मुरा, गौळट, पंढरपुरी अशा जातीवंत म्हशींची खरेदी-विक्री होते. दर आठवडय़ाच्या बाजारातून लाखेंची उलाढाल होते. त्यामुळे व्यापारी, विपेते यांची चढाओढ सुरू असते. मात्र लम्पीमुळे जनावरांचा बाजारच बंद राहिल्याने व्यवहारदेखील थांबले असल्यामुळे व्यापारी विपेते यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत.
बाजार बंद असल्याने वाढल्या समस्या
खरीप हंगामातील बटाटा, रताळी, सोयाबीन, भुईमूग काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना बैलजोडीची गरज भासत आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर पेरणीसाठी बैलांची गरज असते. त्यामुळे मे, जून आणि सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठय़ा प्रमाणात बैलांची खरेदी-विक्री होते. मात्र जनावरांचा बाजारच बंद असल्याने बैलांची खरेदी-विक्री थांबली आहे.
निलजीत आठ जनावरे दगावली : तालुक्याच्या पूर्व भागात लम्पिस्कीनचा वाढता धोका
सांबरा : लम्पिस्कीन आजारामुळे निलजी गावात आतापर्यंत आठ जनावरे दगावली आहेत. तालुक्मयाच्या पूर्व भागामध्ये लम्पिस्कीन आजाराने मृत्युमुखी पावलेल्या जनावरांची संख्या 20 वर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून या आजारामुळे दुग्ध व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे.
येथील शेतकरी विष्णू यल्लाप्पा गाडेकर, भाऊराव नारायण मोदगेकर, आप्पाजी नागेंद्र मोदगेकर, प्रताप भरमा पाटील, बाळाराम मुकुंद, श्रीगुरु सिद्राय अक्षीमनी, वसंत भावकाण्णा पाटील, महादेव भावकाण्णा पाटील या शेतकऱयांची किमती जनावरे दगावली आहेत. तसेच गावातील अनेक जनावरांना या रोगाची लागण झाली असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्यात येत आहेत. गावामध्ये लसीकरण मोहीमसुद्धा राबविली जात आहे. रोग नियंत्रणासाठी पशुपालक शेतकऱयांनी गोठय़ाची स्वच्छता राखावी, निरोगी जनावरांना रोगग्रस्त जनावरापासून वेगळे बांधावे, तसेच गाई व म्हशींना एकत्र ठेवू नये, असा सल्ला या भागाचे पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप शांती नाईक यांनी दिला आहे.
रोग नियंत्रणात असल्याचा दावा
सध्या या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी या रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निलजीसह बसवण कुडची, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री या गावातही या रोगाची लागण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.
अफवा पसरवणाऱयांवर कठोर कारवाईचा इशारा
हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. याबाबत कोणीही सोशल मीडियावर अफवा पसरवून लोकांना भयभीत केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सध्या लम्पिस्कीनचा धोका ओळखून लम्पिस्कीन प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.