गणेबैल येथील काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने आमदार अंजली निंबाळकर यांनी गुरुवार खानापूर पोलीस ठाण्यात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला व सायंकाळपर्यंत अटक झाली पाहिजे, अऩ्यथा शुक्रवारी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील गणेबैल येथील काँग्रेस कार्यकर्ते राजाराम ईश्वर गुरव ( वय 63 ) यांच्यावर बुधवारी रात्री आठ वाजता गणेबैल येथील सतीश गुरव यांने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तानाजी गुरव ,गुंड गुरव व सातेरी गुरव यांनी लाथाबुक्याने राजाराम बेदम मारहाण केली त्यात राजाराम गंभीर जखमी झाले. मारहाण करणारे पळून गेलेले आहेत. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आमदार निंबाळकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुरुवार सकाळी जाब विचारला. यावेळी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना सायंकाळपर्यंत अटक केली नसल्यास शुक्रवार सकाळी 10 वाजता पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.