एच3एन2 विषाणूची वाढती भीती : देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा एका नवीन विषाणूची चिंता वाढत आहे. ‘एच3एन2’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रकरणे पाहता प्रभावी पावले उचलली जात आहेत. देशात ‘एच3एन2’ व्हायरसमुळे आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात ‘एच3एन2’ विषाणूचा कहर सातत्याने वाढत आहे. ‘एच3एन2’ विषाणूपासून मुलांना वाचवण्यासाठी आता शाळा बंद ठेवण्याची कसरत सुरू झाली आहे. पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशात ‘एच3एन2’ विषाणूच्या धास्तीने बुधवारी सरकारने 16 मार्च ते 26 मार्च या कालावधीत आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. 4 मार्चपर्यंत पुद्दुचेरीमध्ये व्हायरल ‘एच3एन2’ सारखी किंवा संबंधित 79 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सद्यस्थितीत ‘एच3एन2’ विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक संशयित ऊग्ण सापडले आहेत. देशात अन्यत्रही फ्लूचे ऊग्ण झपाट्याने वाढत आहेत. याची लक्षणे हंगामी फ्लूच्या विषाणूंसारखीच असतात. यात ताप, खोकला आणि थुंकी यांसह श्वसनाच्या समस्यांची लक्षणे दिसतात. याशिवाय काही ऊग्णांना अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब यासह इतर समस्याही असतात.