जयपूर
जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीसाठी आणखी एका जैन संतांनी प्राणत्याग केला आहे. समर्थसागर महाराज यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. चार दिवसांत देह सोडणारे हे दुसरे संत आहेत. समर्थसागर जी जयपूरच्या सांगानेर येथील संघीजी दिगंबर जैन मंदिरात तीन दिवसांपासून उपवास करत होते. यापूर्वी जैन भिक्षू सुज्ञसागर महाराज यांनी सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ 3 जानेवारी रोजी बलिदान दिले होते.
समर्थसागर महाराज हे आचार्य सुनील सागर महाराज यांचे शिष्य होते. संत समर्थसागर जी यांनी पार्थिव सोडल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी जैन समाजातील लोक मोठय़ा संख्येने मंदिरात दाखल झाले होते. याप्रसंगी श्री सम्मेद शिखरजीला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला असून ते सदैव स्मरणात राहतील, असे सांगानेर येथील संघीजी दिगंबर जैन मंदिराचे प्रमुख सुरेश कुमार जैन यांनी सांगितले.