छत्तीसगडच्या सामरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चिंतामणि महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते पक्षावर नाराज झाले होते. अंबिकापूरमध्ये आयोजित परिवर्तन महासंकल्प रॅलीत भाजप प्रभारी ओम माथूर, संघटनमंत्री पवन साय यांच्या उपस्थितीत चिंतामणि महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करून मी घरवापसी केली आहे. ज्या पक्षात स्थान नाही तेथे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे महाराज यांनी म्हटले आहे. 2013 मध्ये चिंतामणि महाराज यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर काँग्रेसने त्यांना लुंड्रा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने 2018 च्या निवडणुकीत चिंतामणि महाराज यांना सामरी मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. परंतु यावेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Previous Articleही आमची अखेरची निवडणूक, विजयी करा
Next Article राजकारण सोडून अध्यात्माच्या मार्गावर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.