प्रतिनिधी /पणजी
भाजपने विधानसभा निवडणूकीपूर्वी दहा हजार सरकारी नोकऱया देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात की आणखीन सरकारी नोकऱया तयार होणे अशक्य, त्यामुळे भाजपाचा आणखीन एक यु-टर्न असल्याचा आरोप आपने केला आहे. भाजप ही एक जुमला पार्टी असून जनतेची फसवणूक करूनच निवडणूक जिंकत असतात. सत्तेवर आले की आपल्या तिजोऱया भरण्याचे काम करीत असतात. दिल्लीत आणि पंजाब येथे चालत असलेल्या आप सरकारचे भाजपाने अनुकरण गरजेचे आहे असा सल्लाही आपने दिला आहे.
काल पणजीत आपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरेल तिळवे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत राजदीप नाईक, ऍड. अनुप कुडतडकर व अन्य उपस्थित होते. भाजप जनतेला नियमित फसवित आला असून भविष्यातही असेच फसवणूक करणार असल्याने त्यांना आजा बाजूला ठेवणे गरजेचे आहे असेही तिळवे यांनी सांगितले.
निवडणूक जाहिर झाल्यावर 10 हजार नोकऱया देण्याचे आमीश दाखविण्यात आले होते. नंतर आचार संहिता लागल्याचे सांगण्यात आले होते. केवळ युवकांना आकर्षीत करण्यासाठी बेकायदेशीर पध्दतीने काही युवकांना नोकऱया देण्यात आल्या होत्या. आता मुख्यमंत्री म्हणतात की नोकऱया देण्या शक्य नाही. त्यामुळे युवकांना केवळ नोकऱयांचे गाजर दाखवून भाजपने आपला फायदा सादला असल्याचे ऍड. अनुप कुडतडकर यांनी सांगितले. सरकार स्वयंमपूर्ण गोवा असल्याच्या वग्लना करीत आहे मात्र गोवा खऱया अर्थाने गोवा स्वयंमपूर्ण आहेत काय याचा विचार होणे गरजेचे आहे. असेही कुडतडकर म्हणाले.
गोव्यात खाजगी कंपनीतील नोकऱया परप्रांतीय घेत आहेत. मग त्या गोमंतकीयांना का मिळत नाही असे राजदीप नाईक यांनी सांगितले. दिल्लीतील आप सरकारने दहा लाख युवकांना नोकऱया दिल्या आहे त्या सर्वच काही सरकारी नोकऱया नाही. तसे गोवा सरकार का करीत नाही. गोव्यात असलेल्या कंपनीमध्ये काही गोमंतकीय युवक काम करीत आहे त्यांन हिन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणून गोमंतकीय कंपनीत नोकरी करायला तयार नाही. खाजगी कंपनीतून सर्वसामान्य लोकांना जी वागणूक दिली जात आहे त्याच्यावर सरकारने लक्ष देणे जरूरीचे आहे असेही राजदीप यांनी सांगितले.
गोव्यात हॉटेल इन्डस्ट्री मोठय़ाप्रमाणात कार्यरत आहे. मात्र या क्षेत्रात काम करणारे अधिकाधिक परप्रांतीय असतात, गोव्यातील युवक हॉटेल क्षेत्रातील शिक्षण घेतात मात्र नोकरीसाठी ते गोवा सोडून बाहेर जातात असे का याच्यावर विचार होणे गरजेचे आहे. असेही राजदीप म्हणाले.