बाजारात आवक वाढली : शंभर रुपयांना दीड किलो दराने विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही दिवसांपासून सफरचंदांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. साधारण शंभर रुपयांना दीड किलो याप्रमाणे सफरचंद विकली जात आहेत. त्यामुळे फळ खरेदीदारांतून समाधान क्यक्त होत आहे.
दसरा, गणेशोत्सव, दिवाळी व तुळशी विवाहामुळे बाजारात फळांना पसंती दिली जात आहे. सणासुदीच्या काळात फळांची मोठी विक्री होते. इतर फळांच्या तुलनेत सफरचंदाचे दर घसरले आहेत. त्यामुळे नागरिक सफरचंदांची मनमुरादपणे खरेदी करताना दिसत आहेत. एरव्ही 150 ते 200 रुपये किलो दराने मिळणारी सफरचंद 50 ते 60 रुपये किलो दराने विकली जात आहेत.
परतीच्या पावसामुळे भाजीपाला व बागायती पिव उत्पादकांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता फळांच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजारात विविध फळे दाखल होत आहेत. शिवाय सफरचंदांचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्मयात आला आहे.