तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात आजपासून अर्ज स्वीकारणार
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोडला विरोध करण्यासाठी प्रत्येक शेतकऱयाने आपला स्वतःचा वैयक्तिक अर्ज दाखल करावा लागणार आहे. तेव्हाच न्यायालयीन लढाई लढणे सोपे जाणार आहे. म. ए. समितीच्या माध्यमातून हा लढा लढत असला तरी प्रत्येकाने स्वतःची कागदपत्रे काळजीपूर्वक आणून देणे महत्त्वाचे आहे. बुधवारपासून तालुक्मयातील शेतकऱयांनी कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयामध्ये कागदपत्रे आणून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी तातडीने आपली कागदपत्रे जमवून देणे गरजेचे आहे. केवळ 15 दिवस त्यासाठी शिल्लक आहेत. यातच दिवाळी सण आहे. सर्व कामे बाजूला ठेवून शेतकऱयांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
येथील मराठी भाषिकांचे अस्तित्व संपविण्यासाठीच विविध प्रकल्प राबविले जात आहेत. याचबरोबर कन्नड भाषिक असलेली इतर गावे तालुक्मयातील काही भागामध्ये वसविण्यात येत आहेत. हा सरकारचाच डाव आहे. तेव्हा प्रत्येक मराठी भाषिकाने जागृत राहणे महत्त्वाचे आहे. एखाद्या शेतकऱयाची जमीन गेली नसेल तरी त्या शेतकऱयानेही या लढय़ाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. एखाद्या मराठी भाषिक शेतकऱयावर अशाप्रकारे संकट आले तर सर्वांनी एकजुटीने लढा लढणे महत्त्वाचे आहे.
रिंगरोडमध्ये जवळपास तालुक्मयातील 31 गावांतील जमिनी जाणार आहेत. यामध्ये हजारो एकर जमीन जाणार आहे. वास्तविक रिंगरोड करायचा असेल तर हलगा-मच्छे बायपास रस्त्याची गरज काय होती? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शहरातील वाहतूक वळविण्यासाठी हा रिंगरोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा पुणे-बेंगळूरला जोडला गेला आहे. त्याचबरोबर इतर रस्तेही त्याला जोडण्यात आले आहेत. असे असताना रिंगरोडची काहीच आवश्यकता नव्हती.
मागीलवेळी विरोध केल्याने न्यायालयीन लढाईमध्ये शेतकऱयांना दिलासा मिळाला होता. तेव्हा आताही शेतकऱयांनी भूलथापांना बळी न पडता एकजुटीने विरोध करणे गरजेचे आहे. तेव्हा शेतकऱयांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे.
शेतकऱयांच्या सुपीक जमिनीवर डोळा…
रिंगरोडमध्ये अगसगा येथील 19 शेतकऱयांच्या, आंबेवाडी येथील 6, बाची येथील 16, बहाद्दरवाडी-8, बेळगुंदी-37, बिजगर्णी-20, गोजगे-16, होनगा-74, कडोली-41, काकती-2, मास्तमर्डी-6, कलखांब-17, कल्लेहोळ-11, कमकारट्टी-50, कणबर्गी-1, कोंडसकोप-27, मास्तमर्डी-6, मण्णूर-7, मुचंडी-35, मुतगा-58, नावगे-24, संतिबस्तवाड-35, शगमनमट्टी-19, शिंदोळी-65, येळ्ळूर-सुळगा-35, तमनायकनट्टी-धामणे-18, तुरमुरी-8, उचगाव-33, वाघवडे-16, यरमाळ-9, येळ्ळूर-14, झाडशहापूर-36 इतक्मया शेतकऱयांच्या जमिनी जाणार आहेत. याचबरोबर सरकारी जागा, वनविभागाची जागाही जाणार आहे. यामुळे मोठा फटका शेतकऱयांना बसणार आहे. शेतकऱयांची संख्या कमी असली तरी जमिनींचा आकडा मात्र फार मोठा आहे. कारण हा रस्ता सहापदरीसाठी सर्व्हे होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या सुपीक जमिनी रस्त्यामध्ये जाणार आहेत.