जिल्हाधिकारी आवारात प्रवेश न दिल्याने संतप्त
प्रतिनिधी /बेळगाव
लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र आम्हालाच आत प्रवेश दिला जात नाही. हा कोणता न्याय? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱयांनी पोलिसांच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. आंदोलन करणे हा गुन्हा आहे का? काही जणांना आत सोडले जाते तर काही जणांना समोरच अडविले जात आहे. हा दुजाभाव कशासाठी? असे म्हणत शेतकऱयांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
शेतकऱयांच्या वादावादीनंतर तातडीने वरि÷ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी दाखल झाले. त्यांनी शेतकऱयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱयांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
शेतकऱयांचा रुद्रावतार पाहून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर लागलीच अप्परजिल्हाधिकाऱयांना बोलाविण्यात आले.
अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी हे दाखल झाले मात्र आपण आता निवेदनच देणार नाही, असा पावित्रा शेतकऱयांनी घेतला. त्यामुळे पुन्हा गोंधळ उडाला. एकूणच शेतकऱयांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी चांगलीच धास्ती घेतली होती. पोलिसांनी शेतकऱयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अप्परजिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.