वाहतुकमंत्री मावीन गुदीन्हो
प्रतिनिधी / पणजी
राज्यात बसगाडय़ा मोठय़ाप्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुले अनेक ठिकाणी प्रवासी बसगाडय़ांची समस्या निर्माण झाली आहे. कंदब महामंडळाकडे बसगाडय़ा कमी असून कोविड काळात बंद झालेल्या खाजगी प्रवासी गाडय़ा पून्हा सूरूच झाल्या नाहीत. मालक त्या प्रवासी बसगाडय़ा सुरु करण्यास इच्छूक नाही. त्यामुळे खाजगी प्रवासी गाडय़ा भाडेपट्टीवर घेण्याचा विचार सरकार करीत आहेत. तसे झाल्यास कोणते तरी जुगाड करून पर्यमतदार संघासाठी प्रवासी बस देता येईल असे वाहतूक मंत्री मावीन गुदीन्हो यांनी सांगितले.
पर्ये मतदार संघात अनेक ठिकाणी प्रवासी बसगाडय़ा नसल्याने लोकांचे हाल होतात अशी लक्षवेदी सूचना पर्य मतदार संघाच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत मांडली होती. त्या म्हणाल्या की वेळेवर प्रवासी वाहने नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. विद्यार्थी ट्रक टेम्पो अशा मिळेत्या गाडीतून कॉलेजला जातात कॉलेजला जाण्यासाठी 20 ते 25 कि.मी.चे अंतर असल्याने वाटेत कोणताही प्रसंग त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती कशीही असली तरी कॉलेजला पोचणे गरजेचे असल्यामुळे विद्यार्थी कोणते तरी जुगाड करून कॉलेजमध्ये पोचतात. मात्र हा प्रकार विद्यार्थ्यांना घात असून पर्यमतदार संघात बसची व्यवस्था करावी अशी मागणी दिव्या राणे यांनी केली असता. माविन गुदीन्हो यांनी जुगाड करून बसची व्यावस्था करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.