आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेऊन भाजप आणत असलेल्या आध्यादेशाविरोधात पाठिंब्यासाठी विनंती केली. आपच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही पाठींबा दिल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा >>> देशात लोकशाहीवर आघात होत आहे; भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज- शरद पवार
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “दिल्लीतील लोकांबरोबर खुपच अन्याय झाला आहे. केंद्र सरकारने आम्ही सत्तेवर आल्यावर एका आध्यादेशाने आमचे सर्व हक्क खारीज केले. त्यानंतर आम्ही या विरोधात लढाई लडून जिंकलो. पण त्यानंतर ही केंद्र सरकार पुन्हा अशाच प्रकारचा आध्यादेश आणून दिल्लीतील निवडून आलेल्या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आता देशभर फिरत असून भाजप आणू पाहत असलेल्या कायद्याला सर्वांनी विरोध करावा यासाठी देशातील पक्षांना आवाहन करत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले “हा फक्त दिल्लीच्या लोकांवरिल अन्याय नाही देशातील सर्व राज्यामध्ये हि परिस्थिती आहे. त्यामुळे याविरुद्ध लढण्यासाठी मी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला या आध्यादेशाविरोधात पाठिंबा दर्शिवला आहे. राज्यसभेत कोणत्याही पक्षाला पुर्ण बहूमत नसल्याने हा आध्यादेश नामंजूर होउ शकतो.”