एप्रिलमध्ये कोळसा उत्पादन 28 टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली ः देशामध्ये काही भागात वीज संकट असल्याच्या दरम्यानच्या काळात एप्रिल महिन्यात देशात कोळसा उत्पादन 28 टक्क्यांनी वाढून 6.61 कोटी टनावर पोहोचले आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे वीज प्रकल्पांमध्येही कोळशाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत गेली आहे.
कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2022च्या दरम्यान भारताचे एकूण कोळसा उत्पादन 661.54 लाख टन राहिले होते. एप्रिल 2021 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 5.16 कोटी टन राहिल्याची माहिती आहे.
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी मागील महिन्यात 5.34 कोटी टन कोळशाचे उत्पादन घेतले आहे. ज्यामध्ये सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) कडून 53 लाख टन आणि स्वतःसाठी वापरण्यात येणाऱया खाणींमधून 73 लाख टन कोळसा उत्पादन घेण्यात आल्याची माहिती आहे.
कोळसा मंत्रालयाच्या आकडेवारीतून ज्या महिन्यात कोळसा क्षेत्रात एकूण उचल 7.08 कोटी टन होती, तर वीज क्षेत्रातील उचल एप्रिलमध्ये 6.17 कोटी टनाच्या घरात पोहोचली आहे. एकटय़ा कोल इंडियाकडून वीज क्षेत्राचा कोळसा पुरवठा हा 4.97 कोटी टन राहिला आहे, असे सांगितले आहे.
वीज क्षेत्रात कोळशाची मागणी मागील महिन्यात वार्षिक आधारे 15.6 टक्के अधिक होती. यात कोल इंडियाचे देशातील कोळसा उत्पादनात 80 टक्के अधिक योगदान राहिले आहे.