जिल्हा प्रशासन-महापालिकेची केवळ आश्वासने
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक संपूर्ण राज्यामध्ये ऐतिहासिक ठरत असते. यावषीही भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भक्तांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे भक्तांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे बसण्यासाठी गॅलरीची दरवषी उभारणी करण्यात येते. मात्र यावषी गॅलरी नसल्यामुळे महिला तसेच ज्ये÷ आणि लहान मुलांना दुभाजक किंवा एखाद्या दुकानाच्या कठडय़ावर बसून मिरवणूक पहावी लागली.
गणेश विसर्जन मिरवणूक भव्य प्रमाणात निघत असते. यामध्ये पारंपरिक वाद्यांबरोबरच विविध शौर्यपथके तसेच झांजपथके भाग घेत असतात. त्यामुळे ते पाहण्यासाठी तसेच गणेश दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओढा दरवषीच वाढलेला असतो. दोन वर्षे कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली. मात्र यावषी कोरोना कमी झाल्यामुळे भव्य मिरवणूक निघाली. विविध झांजपथकांनी आकर्षक पोषाख करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र ते पाहण्यासाठी पालकांना लहान मुलांना खाद्यांवर घेण्याची वेळ आली.
सर्वत्र गर्दीच गर्दी होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव जिल्हय़ाबरोबरच जवळच्या जिल्हय़ांसह महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांतून भाविक येत असतात. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गॅलरी नसल्यामुळे कोठे उभे रहायचे? असा प्रश्न निर्माण झाला. गर्दी असल्यामुळे लहान मुले, महिलांना अधिक त्रास सहन करावा लागला. यातच पाऊसही पडत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती.
अनेक ठिकाणी गटारींवर फरशीच नव्हत्या. त्याचबरोबर काही रस्ते नाहक अडविण्यात आले. त्यामुळे शहरामध्ये प्रवेश करणाऱयांपासून ते मिरवणूक पाहण्यापर्यंत साऱयांनाच कसरत करावी लागली. यामुळे भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक ही मिरवणूक काढण्यापूर्वी सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकेने केली पाहिजे. केवळ पाहणी करून आश्वासने देऊन प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. त्यामुळे भक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट करणे
कर्कश आवाजाच्या भोंग्यांचा नाहक त्रास
या मिरवणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे भोंगे तसेच इतर वस्तू विकण्यासाठी विक्रेतेदेखील दाखल होतात. यावषी कर्कश आवाजाचे भोंगे उपलब्ध करण्यात आले होते. ते भोंगे तरुण तसेच तरुणीदेखील घेऊन जोराने वाजवत होते. भक्तांच्या कानाजवळच ते आवाज करत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. एक तर डीजे आणि वाद्यांचा आवाज त्यातच हे कर्कश आवाजाचे भोंगे वाजविल्यामुळे ज्ये÷ांतून आणि महिलावर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.