इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा, माय मराठी नक्षत्र प्रति÷ान नागपूर आणि मनसा क्रिएशन्स गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय महोत्सव
पणजी/प्रतिनिधी
आचार्य विजयाताई मारोतकर यांच्या नागपूर येथील मायमराठी नक्षत्र प्रति÷ानने अकराव्या स्व.केशवराव मारोतकर स्मृती काव्यस्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा गोव्यात आयोजित केला असून त्या निमित्ताने इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा आणि मनसा क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ काव्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. इन्स्टिटयूटच्या सभागृहात नागपूर आणि गोव्यातील साहित्यकांच्या सहभागाने हा महोत्सव शनिवार 16 व रविवार 17 जुलै रोजी दोन दिवस होणार आहे. या सोहळय़ात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रित कवी कवयित्री?चे कविसंमेलन होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्ष म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांची उपस्थिती असेल. तर कविश्रे÷ बा.भ. बोरकर यांच्या सुकन्या मुक्ताताई आगशीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच इन्स्टिटय़ूटचे सदस्य सचिव आणि कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब, इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष प्रा.गोरख मांदेकर, गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाचे सहाय्यक माहिती अधिकारी शाम गावकर, कोकण मराठी परिषद गोवाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, अड. रमाकांत खलप, नागपूरच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. मनीषा यमसनवार या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी स्वर्गीय केशवराव मारोतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोवा आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय “पाऊस” काव्य स्पर्धेच्या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार -1501 रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय पुरस्कार-1001 रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पुरस्कार- 701 रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आणि उत्तेजनार्थ तीन पुरस्कार प्रत्येकी पाचशे रुपये व सन्मानपत्र देण्यात येईल. या महोत्सवाच्या निमित्ताने महनीय व्यक्तिंचा सन्मान करण्यात येणार आहे. यात तरुण भारतचे संपादक आणि कोकण मराठी परिषद गोवाचे अध्यक्ष सागर जावडेकर ,गोमंत विद्यानिकेतन मडगावचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, युथ हॉस्टेल गोवाचे संचालक मा. अनंत जोशी आदींचा समावेश आहे. तसेच मराठी साहित्य क्षेत्रातील काही होतकरू साहित्यकांनाही यावेळी “युवा सन्मान” देऊन गौरविण्यात येणार आहे . यात निसर्गकन्या समृद्धी केरकर, कायदेतज्ञ कवयित्री भक्ती सरदेसाई, मेणकुरे गावातील पहिल्या लेखिका म्हणून समोर आलेल्या सृष्टी नाईक व इंदू परब तसेच नव्या दमाचे युवा कवी विठ्ठल शेळके यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नागपूर येथील मायमराठी नक्षत्र प्रति÷ानचे मार्गदर्शक प्रा. प्रभाकर तांडेकर ’प्रदत्त’ यांच्या ’प्रभाकरा’ या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ.मोनाली पोफरे यांच्या ग्रंथाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे .त्यानंतर कवी दशरथ परब यांच्या ’स्वप्न फुलांचे निळे चांदणे ’ या काव्यसंग्रहावर प्रा.विजयाताई मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे. यात गोव्यातील प्रा.अंजली चितळे आणि प्रा.पौर्णिमा केरकर यांचा सहभाग असेल. दुसऱया सत्रात प्रा.डॉ.नीता तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील साहित्यकि डॉ. भारतीताई खापेकर उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात गोव्यातील माधुरी शेटकर, डॉ. शिल्पा डुबळे परब, तेजा आरोंदेकर, राजू नाईक, प्रदीप नाईक, दुर्गाकुमार नावती, गौरीश वेर्णेकर, प्रकाश क्षीरसागर, विठ्ठल शेळके, सिद्धी उपाध्ये यांचा तसेच नागपूर येथील प्रा. प्रभाकर तांडेकर, निता अल्लेवार, डॉ. माधव शोभणे, अरुणा कडू, विकास गजापुरे, गोविंद सालपे, डॉ. राजेश काळे ,डॉ.सुनंदा जुलमे, पल्लवी उमरे या महाराष्ट्रातील निमंत्रित कवी कवयित्री?चा सहभाग असणार आहे. डॉ. माधव शोभणे आभार प्रदर्शन करणार आहेत. दुसऱया दिवशी दि. 17 रोजी दुपारी 3. 30 वाजता चित्रा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ’पाऊसधारा’ कविसंमेलन होणार आहे. मायमराठी नक्षत्र प्रति÷ानचे उपाध्यक्ष विशाल देवतळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात नागपूर येथील डॉ. समिधा चव्हाण, डॉ.संगीता रेंगे, चरणदास वैरागडे, मनीषा ताटपल्लीवार, निमा बोडखे, विनय पाटील, स्मिता किडीले ,डॉ.मोनाली पोफरे ,मंदा खंडारे, भावना टेकाडे , डॉ. साधना तेलरांधे यांचा तर गोवा येथून अक्षता किनळेकर, शितल साळगावकर, अनुराधा म्हाळशेकर, आरती दिनकर, बबीता गावस, इंदु परब, सृष्टी नाईक, समृद्धी केरकर, दया मित्रगोत्री, शर्मिला प्रभू, नूतन दाभोळकर, रजनी रायकर,दीपा मीरिंगकर, नीला भोजराज, राधिका काळे, आरती मोने, गौरी भालचंद्र, श्वेता राऊत देसाई ,वर्षा नार्वेकर, तेजश्री प्रभुगावकर या कवयित्री?चा सहभाग असणार आहे. सहभागी कवी कवयित्री?ना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी या आषाढ काव्यमहोत्सवात सहभागी व्हावे असे आयोजकांनी कळविले आहे.