प्रज्ञा मणेरीकर /पणजी
‘आषाढ’ म्हटलं की, आठवतो ढगांच्या काळय़ा पुजक्मयांआडून गर्जना करत बसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ‘मेघदूत’. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासाचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सदोदित जाणवत राहतं आणि मनात तरळते ती ‘मेघदूत’ या सर्वागसुंदर प्रेमकाव्यातली पहिली ओळ ‘आषाढस्य प्रथम दिवसे।’
कालिदासाच्या ’मेघदूत’ या विरहकाव्यातील दुसरा श्लोक ’आषाढस्य प्रथम दिवसें’ हा आजच्या दिवसासाठी प्रसिद्ध आहे. ज्ये÷ कवी कुसुमाग्रज यांनादेखील कालिदासाच्या मेघदूताची भूरळ पडल्याने त्यांना त्याचा अनुवाद केला होता, तो प्रसिद्ध आहे. ’आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लष्टिसानु । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।’ या ओळीकडे विद्वानांचे लक्ष गेले. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीनुसार कालिदासांचे कार्य हेच महत्त्वाचे मानून विद्वानांनी कालिदास दिन आषाढाच्या पहिल्या दिवशीच साजरा करायचे ठरवले. त्यानुसार आजच्या दिवशी कालिदास दिन साजरा होऊ लागला. दूतकाव्य लिहिणारा कालिदास हा पहिला कवी. त्याच्या या दूतकाव्याची मोहिनी एवढी मोठी की, त्यानंतर अनेक दूतकाव्ये लिहिली गेली, पण काव्यप्रतिभेत ती मेघदूताजवळसुद्धा पोचली नाहीत.
निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासाचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सदोदित जाणवत राहते आणि ’मेघदूत’ मनात तरळत राहते. यक्षांचा प्रमुख कुबेराच्या शापामुळे प्रिय पत्नीचा विरह सहन करत मेघदूत या काव्यातील यक्ष रामगिरीवर एकेक दिवस कंठत आहे. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशा परिस्थितीत आषाढातील एखाद्या हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून यक्ष त्यालाच आपला संदेश वाहक करतो. मेघदूताची ही अशी कथा आहे. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला आपल्या घराचा पत्ता असेच मेघदूताचे स्वरूप आहे.
‘मेघदूत’ हे एक सर्वागसुंदर प्रेमकाव्य आहे. ते कुठल्याही पुराणकथेवर आधारलेलं नाही. मानवी अंतःकरणातील प्रेमाचा आणि त्यातून उद्भवणाऱया विरहवेदनांचा तो सुस्पष्ट आविष्कार आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचल्यावर तो स्वतः किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचली तरी तो स्वतः किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते. निसर्ग, प्रदेश, माणसं यांबद्दलचं त्याचं भान आणि जाण, त्यांबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला ठायीठायी जाणवत राहातं. खरं तर मेघाच्या अलकानगरीच्या प्रवासमार्गात उज्जयिनी ही नगरी येत नाही. तरीही ती पाहण्यासाठी मेघानं जरा वाट वाकडी धरावी, असं यक्ष त्याला सांगतो आणि उज्जयिनीच्या सौंदर्याचं वर्णन करतो. या वाकडया रस्त्यामुळे मेघाला आपल्या पत्नीकडे पोहोचायला उशीर होणार आहे, हे यक्षाला कळत असतं. तरीही मेघानं उज्जयिनीला जावेच, असा यक्षाचा आग्रह असतो. ही रसिकता प्रत्यक्षात कालिदासाचीच रसिकता आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.
‘मेघदूत’ या काव्याचा गाभा ‘शृंगाररसा’वर आधारलेला आहे. त्यातही साहित्याच्या दृष्टीनं श्रे÷ असा हा ‘विप्रलंभ- शृंगार’ म्हणजे विरहातला मनोवेधक शृंगार आहे. साहजिकच शृंगारातल्या सा-या उत्कट भावनांचा आणि विभ्रमांचा आविष्कार ’तन्वी श्यामा..“सारख्या श्लोकांमधून व्यक्त होतो. पण कालिदास हा संस्कृत भाषेतला सुसंस्कृत कवी आहे. त्यामुळे तो निसर्गसुलभ प्रकृतीचा आविष्कार करतो. पण विकृतीकडे झुकणारी वर्णनं मात्र आवर्जून टाळतो.