वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील चेंगडू येथे 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या आशिया कनिष्ठ बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचे 39 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने विविध वयोगटात मुले आणि मुलींच्या विभागासाठी 39 सदस्यांची निवड केली आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ बॅडमिंटनपटूंसाठी बेंगळूरात निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेत भारतीय बॅडमिंटन संघाची निवड करण्यात आली आहे. 17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व अनुक्रमे ज्ञान दत्तू आणि तन्वी रे•ाr यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. 15 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या विभागात बी. शाम आणि तन्वी पत्री यांना टॉप सिडींग देण्यात आले आहे. चेंगडूमध्ये गेल्या वेळी झालेल्या या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 3 पदके मिळवली होती. शनिवारी भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघ चेंगडूला रवाना झाला.