वाहनधारकांची गैरसोय : केवळ सीईओंच्या बंगल्यापर्यंत रस्ता बनला गुळगुळीत
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील स्वतंत्रता मार्गाच्या डांबरीकरणाचे काम केवळ सीईओ बंगल्यापर्यंतच करण्यात आले असून उर्वरित रस्त्यावरील ख•s जैसे थे असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सीईओंच्या सोयीकरिता या रस्त्याचे डांबरीकरण्यात आले का? असा प्रश्न वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. अर्धवट कामामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरातील काही रस्त्यांची दैनावस्था झाली होती. त्यामुळे आमदार निधी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र ही कामे अर्धवट केल्याचे निदर्शनास आले आहे. विविध रस्त्यांवर मोठमोठे ख•s निर्माण झाले होते. शहरातील वाहतूक स्वतंत्रता मार्गाने गांधी चौकापर्यंत वळविली जाते. त्यामुळे काहीवेळा अवजड वाहतूक या रस्त्यावरून होत असते.
परिणामी स्वतंत्रता मार्ग खूपच खराब झाला आहे. गणेशपूरकडे जाणारे वाहनधारक स्वतंत्रता मार्गाचा अवलंब करतात. तसेच विविध शाळा असल्याने हा रस्ता रहदारीचा बनला आहे. पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. शहरातील वाहतूक या रस्त्याने वळविण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. तसेच
कॅन्टोन्मेंटकडे निधी उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कानाडोळा केला होता.
कॅन्टोन्मेंट कार्यालयातील शौर्य चौक आणि गांधी चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. पण निम्म्या रस्त्याचे डांबरीकरण करून केवळ ख•dयांची डागडुजी करण्यात आली आहे. ग्लोब थिएटर ते सीईओ बंगल्यापर्यंतच्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात आले. तसेच शौर्य चौक ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील ख•s बुजवून पॅचवर्क करण्यात आले. मात्र सीईओ बंगल्यापासून शर्कतपार्कपर्यंतच्या रस्त्यावरील ख•s बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
हा रस्ता खूपच खराब झाला असून ये-जा करताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील ड्रेनेज चेंबरजवळ मोठी चर निर्माण झाल्याने अवजड वाहनांसह सर्वच वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. केवळ सीईओ बंगल्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करून सीईओंची गैरसोय दूर करण्यात आली आहे का? सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे काय? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. धोकादायक आणि ख•sमय बनलेल्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.