मंदिरावर झाड कोसळल्याने सात जाणांचा मृत्यू आणि ३० हून अधिकजण जखमी झाल्यानंतर राज्य़भरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली. या प्रकरणात आता अंध्दश्रद्धा निर्मुलन समितीने उडी घेतली असून सात जणांचा जीव अंद्धश्रद्धेमुळेच गेला असल्याचा आरोप समितीने केला आहे.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी मंदिरात काल रविवारी रात्री एका कार्यक्रमाला मोठ्या संख्येत ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. आरती सुरू असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यावर मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक मंदिरात आले. त्याच वेळी, शेजारी असलेले लिंबाचे झाड मंदिराच्या शेडवर कोसळल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ३० जण जखमी झाले. तर अजूनही ढिगाऱ्याखाली सापडल्याची भिती व्यक्त केले जात आहे. जखमींना ताबडतोब अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीने आरोप केले आहेत. समितीच्या आरोपानुसार हे लोक अंधश्रद्धेमुऴे बळी गेले आहेत. त्यांनी सरकारवर आरोप करून या घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देशही त्यांनी दिले.