मुंबईतील प्रदुषणाला धूळ आणि हवेतील प्रदुषित घटक दोन्हींची कारणे दिली जात आहेत. प्रदूषण कमी करण्यास मुंबई महानगरपालिकेने धूळ कमी करण्याच्या विचारातून तसे आदेश दिले आहेत. मात्र वातावरणातील प्रदुषकांचे काय? निव्वळ धूळ माऊन चालणार नाही, तर मुंबईतील वातावरणाची जी काही धूळधाण उडाली आहे. त्यावर वस्तूस्थितीजन्य आणि ठोस उपाय हवेत. अन्यथा स्मॉग टॉवर आणि एअर प्युरिफायरसारखे बंद खोलीतील उपाय तकलादू निघाल्यास मूळ प्रदुषणाचा प्रश्न जैसे थे अवस्थेत राहिल.
निरी संस्थेचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. के. व्ही.
जॉर्ज, भारत सरकारच्या बोस इन्स्टिट्यूट सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. अभिजीत चॅटर्जी आणि सीएपीएचईआर आणि एम्सचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. हर्षल साळवे यांच्यासह तज्ञ आणि वैज्ञानिकांची स्मॉग टॉवर उभारणीवऊन नुकतेच चर्चासत्र झाले. या चर्चासत्रातून एअर प्युरीफायर किंवा स्मॉग टॉवरसारखी उभारणी करणे म्हणजे प्रदुषणावरील तात्पुरता उपाय असून त्यावर कायमचा तोडगा हवा. किमान कायमचा आणि ठोस उपायाकडे जाण्याचा मार्ग तरी तुर्तास स्वीकारला जावा असाच सूर होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी मfिहन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत धूर प्रतिबंध टॉवर उभारणार असल्याचे घोषित केले. आयुक्त इकबाल चहल यांनी त्याअनुसरून बजेटमध्ये तरतूद केली. मात्र स्मॉग टॉवर उभारल्यास खरंच उपयोग होईल का प्रदुषणाचा प्रश्न सुटेल का? मात्र मुंबईतील हवेच्या दर्जाचा प्रश्न गंभीर असून या टॉवरचा उपयोग होणार नाही. असे नीरीचे डॉ. के व्हि जॉर्ज यांनी स्मॉगच्या चर्चासत्रात मांडले. भारत सरकारच्या बोस इन्स्टिट्यूट सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. अभिजीत चॅटर्जी यांच्या म्हणण्यानुसार असे पर्याय वस्तूस्थितीला धरून नसून अवैज्ञानिक आहेत. अशा पर्यायांचा कालावधी एक-दोन वर्ष राहू शकतो. तर प्रदुषणावर कायमस्वऊपी उपाय म्हणजे हरित पट्टे वाढवणे होय. अशा तात्पुरत्या प्रकल्पांवर खर्च करणे चुकीचे असल्याचे मत यावेळी तज्ञांनी मांडले. दरम्यान रविवारी मुंबई महानगर पालिकेने तातडीची बैठक घेऊन धूळ आणि प्रदुषणावर अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यात आली. यात मुंबई महानगरात यापूर्वी कधीही नव्हती, अशी हवा प्रदूषण स्थिती निर्माण झाली असल्याची कबुली महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्यावरील अभ्यास कऊन या चर्चेत शहराची सद्यस्थिती मांडली. शिवाय प्रशासनाला किती गंभीर होऊन काम केले पाहिजे याची सक्त सीमा रेषा आखण्याचे ठरले आहे. एकंदरीत प्रशासनाने प्रदुषणाविरोधात लढण्याची जय्यत तयारी केली आहे. कोविडचा लॉकडाऊन संपल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे तसेच बांधकामे सुऊ झाली. यातून निर्माण होणारी धूळ, त्याच्या सोबतीला हवेच्या स्थितीमध्ये आणि वेगामध्ये झालेले बदल हे दोन प्रमुख घटक आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्तास मुंबईत सुमारे 5 हजारहून अधिक ठिकाणी विविध कामे सुरू असून निर्माण होणारी धूळ अटकाव करणे शक्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे तज्ञांची सात सदस्यीय समिती गठीत कऊन अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र हे सर्व तडकाफडकीचे आदेश मुंबईत होणाऱ्या जी20 च्या परिषद बैठकीपोटी देण्यात आलेत का असा प्रश्न विचारला जात आहे. जी20 बैठक संपली की पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती तर होणार नाही ना अशी उपशंका देखील उपस्थित केली जात आहे. यात शंकांकित प्रश्नांना यापूर्वीची पार्श्वभूमी कारणीभूत असल्याचे वातावरण तसेच हवामान स्थितीवर अभ्यास करणारे तज्ञ वर्तवित आहेत.
वातावरण फाऊंडेशनचे भगवान केसभट यांच्या मते मुंबईत स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी मूळपर्यंत जाण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत स्मॉग टॉवर किंवा एअर प्युरीफायर वर बोलताना सांगितले की, कोणी रस्त्यावर एसी लावला असं झालं का असा प्रश्न उपस्थित केला. इनडोअर लावतात ते एअर प्युरीफायर जसे राजभवनात मोठे फॅन लावले असून ते धूळ खेचून उंच वातावरणात फेकतात. मात्र हे सभागृहच बंद असल्याने त्या
फॅनचा उपयोग होऊ शकतो. उघड्यावर उभारण्यात येणारे स्मॉग टॉवर किंवा एअर प्युरीफायर उभारून ते कितपत उपयोगी पडतील अशी शंका केसभट उपस्थित करतात. प्रदुषणाला नियंत्रणासाठी सध्या जे काही पर्याय शोधले जात आहेत, ते पर्याय वस्तुस्थितीला धरून नसल्याचे वातावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था सांगतात. याचे उदाहरण म्हणजे मुंबईवर ठराविक उंचीवर जाऊन पाहिल्यास येणारी प्रदूषित हवा ही ठाणे, नवीमुंबई, उल्हासनगर, वसई, विरार, बदलापूरसारख्या भागातील इंडस्ट्रीयल पट्ट्यातून येणारी हवा आहे. या ठिकाणाहून बऱ्याच अंशी हवेला प्रदूषित करणारे घटक वातावरणात सोडले जातात. यावर शासकीय कारवाई केली जात नाही. किंवा कारवाई करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यासह हवेला कोणत्याही सीमांची मर्यादा नसल्याने ही प्रदुषित हवा मुंबई महानगर प्रदेशावर सतत घिरट्या घालत असते. यासाठी प्रदूषणाचा विचार करून काहीतरी नियमावली आखावी लागेल. एमएमआररिजनसाठी क्लस्टर आखावे लागेल अशी सूचना भगवान केसभट करतात. नवी मुंबईतील उपनगरात भयानक प्रदूषण असून कोपर खैराणे, वाशी नेऊळ, खारघर आदी परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंगवॉक दरम्यान श्वासोश्चवासातून तोंडात येणाऱ्या लाळेला देखील प्रदुषणाचा स्वाद असल्याच्या तक्रारी येत आहेत. मुंबईत प्रदूषक पीएम10 चे 9 टक्के प्रमाण आणि पीएम2.5 प्रदुषके 13 टक्के प्रमाण आहे. असे प्रमाण असताना हवा प्रदुषित होण्याचे 90 टक्के दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप वातावरणावर काम करणारे तज्ञ करत आहेत. विकासकामांतून उडणाऱ्या धुळीसह
हॉटेल, तुंदूर भट्टी, बेकरी, वाहन सारखी प्रदूषण साधने हॉटस्पॉट ठरत आहेत. शहरात जुन्या गाड्या अजूनही फिरत असून अशा गाड्यांवर आरटीओने रेड रिबन लावून अशी जुनी वाहने निदर्शनात आणण्याचे काम केले पाहिजे. या धर्तीवर लंडन शहरात अल्ट्रा लो इनिशियल झोन निर्माण कऊन त्या झोनमध्ये जुनी तसेच प्रदूषण निर्माण करणारी वाहने प्रतिबंधित केली असल्याचे उदाहरण केसभट यांनी सांगितले.
दरम्यान fिहवाळी अधिवेशनात मुंबईतील एका विकासकावर बंदी आणावी असा मतदारांनी दबाव आणला होता. अशी उदाहरण आता समोर येत असून नागरिक प्रदुषणावर चिडल्याचे चित्र आहे. गोवंडी, बोरिवली, मरीन लाईन, मुंलुंड सारख्या परिसरातून रहिवाशी प्रदुषणावर आवाज उठवत आहेत. मात्र प्रदुषणाचा प्रश्न म्हणजे किरकोळ असे कित्येक वेळा आमदारच बोलून याकडे दुर्लक्ष केल्याची उदाहरणे दिली जात आहेत. विकासकामेच नव्हे तर मुंबईत प्रदूषण निर्माण करणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी काही नियमन केल्यास त्यातील प्रश्न सुटण्याची आशा आहे. दोन दिवसांपूर्वीच्या एका वृत्तानुसार प्रदुषणामुळे थायलंड शहरात इमर्जंसी घोषित करण्यात आली असून महिला मुलांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अशी इमर्जन्सी घोषित होईपर्यंत मुंबईकरांनी वाट पाहत रहावी का.
राम खांदारे