वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवारी ओमानच्या आखातात भरकटलेल्या आणि अपघातग्रस्त होवून बुडालेल्या तेलवाहू जहाजात अडकलेल्या भारतीय 13 भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. या खलाशांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाची एक युद्धनौका आणि पी-81 विमान घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. बुडालेल्या जहाजात श्रीलंकेचे 3 खलाशीही आहेत.
बुडालेल्या जहाजावरुन संकटात असल्याचा संदेश येताच भारतीय नौदलाने आपत्कालीन साहाय्याच्या योजनेवर काम करण्यास त्वरित प्रारंभ केला. खलाशांची सुटका करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना ओमानच्या नौदलाचेही सहकार्य मिळत आहे. भारत आणि ओमान यांच्यात अशा सहकार्याचा करार सप्टेंबर 2021 मध्ये झाला आहे. हे तेलवाहू जहाज कसे दुर्घटनाग्रस्त झाले याचा शोधही घेतला जात आहे.