नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाने बुधवारी भारतीय संघाविरुद्ध होणाऱया आगामी मालिकांची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन संघ भारताच्या दौऱयावर येणार आहेत.
यजमान भारताचे द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध सहा सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाला सराव मिळावा, या हेतूने ही मालिका आयोजित केली आहे. या मालिकेला 20 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. त्याचप्रमाणे द. आफ्रिकेचा संघ या दौऱयात भारताविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले आहे.