जिल्हा परिषदेने दिली मान्यता, हवामाने केंद्रे बळीराजाला ठरणार मार्गदर्शक
विशाल कदम/ सातारा
हवामानाचा तंतोतंत अंदाज घेता यावा याकरता राज्यात 2127 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा फायदा पिक विमा योजना, हवामान आधारित फळ पिक विमा योजना, कृषि हवामान सल्ला व मार्गदर्शन यासाठी उपयोगी ठरत आहे. राज्य शासनाच्या पुनर्वसन विभागाच्या बैठकीनुसार राज्यात 29 हजार ग्रामपंचायतीपैकी 10 हजार ग्रामपंचायतीमध्ये हे हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. सातारा जिह्यात 526 ग्रामपंचायतींमध्ये या पेंद्र उभारणीचे उद्दिष्ठ आहे. तत्पूर्वी सध्या 98 मंडलांमधील स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यास जागा निश्चितीची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्यावतीने सुरु आहे.
हवामानाचा अंदाज कळला तर शेतकऱयांना पिके घेताना व काढताना नियोजन करता येते. शेतीची मशागतीची कामे वेळेवर करता येतात. राज्यात शासनाच्या मान्यतेने महावेध हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या प्रकल्पामध्ये 2127 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्या पेंद्राचा फायदा शेतकऱयांना पिक विम्यापासून ते कृषी संशोधन कार्यासाठी उपयोगी ठरते. सध्या असलेले स्वयंचलित हवामान केंद्रे मर्यादित असल्याने राज्याच्या पुनर्वसन विभागाच्या बैठकीत राज्यात 29 हजार ग्रामपंचायतीपैकी 10 हजार ग्रामपंचायतीच्या स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी उद्दिष्ठ दिले आहेत. त्यामध्ये सातारा जिह्यासाठी तब्बल 526 ग्रामपंचायतीचे उद्दिष्ठ आहे. 98 मंडलामध्ये केंद्रे उभारण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे आणि कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिल्या आहेत.
जिह्यात सर्वात जास्त सातारा तालुक्यात
सर्वात जास्त सातारा तालुक्यात हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये मंडले पुढीलप्रमाणे सातारा तालुक्यात सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, दहिवड, परळी, वडूथ, तासगाव, अपशिंगे. जावली तालुक्यात मेढा, आनेवाडी, कुडाळ, बामणोली, केळघर, करहर. पाटण तालुक्यात पाटण, म्हावशी, मल्हारपेठ, मारुल हवेली, मरळी, चाफळ, हेळवाक, मोरगिरी, येराड, ढेबेवाडी, तळमावले, कुठरे, तारळे, आवर्डे. कराड तालुक्यात कराड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर, येळगाव. कोरेगाव तालुक्यात कोरेगाव, कुमठे, रहिमतपुर, शिरंबे, वाठारकिरोली, वाठारस्टेशन, पिंपोडे बुद्रूक, सातारारोड, किन्हई. खटाव तालुक्यात खटाव. औंध, पुसेगाव, बुध, वडूज, कलेढोण, पुसेसावळी, मायणी, निमसोड, कातरखटाव. माण तालुक्यात दहिवडी, मलवडी, आंधळी, गोंदवले बुद्रूक, कुकुडवाड, म्हसवड, वरकुटे मलवडी, मार्डी, शिंगणापूर. फलटण तालुक्यात फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रूक, वाठारनिंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव. खंडाळा तालुक्यात खंडाळा, वाठार बुद्रुक, शिरवळ, लोणंद. वाई तालुक्यात पसरणी, पाचवड, धोम, वाई, भुईज, ओझर्डे, सुरुर. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा, लामज, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.
जागा निवडीचे काम सुरु आहे
सध्या जिह्यात हवामान केंद्रे उभारणीच्या अनुषंगाने 526 गावांमध्ये जागा निवडीचे काम सुरु आहे. हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांचा आणि शासनाचा फायदा होणार आहे.
विजय माईनकर,
जिल्हा कृषी विकास अधिकारी