जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
खरीप पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना दरवषी लागू केली जाते. या योजनेसाठी शेतकऱयांनी विमा भरला पाहिजे. मात्र बरेच शेतकरी अजूनही दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनजागृती केली जात आहे. शुक्रवारी या जनजागृती फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
जिल्हा कृषी विभागातर्फे जिह्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेची ही जनजागृती आठवडाभर केली जाणार आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये वाहने पाठविण्यात आली आहेत. या माध्यमातून शेतकऱयांना विमा भरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. विविध पिकांसाठी हा विमा लागू असून शेतकऱयांनी तातडीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
लहरी हवामानामुळे बऱयाचवेळा पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱयांना फटका बसतो. ते नुकसान भरून निघणे कठीण जाते. मात्र विमा भरला तर त्या पिकाची नुकसान भरपाई मिळते. त्यासाठी शेतकऱयांनी जी काही रक्कम असते ती तातडीने भरावी, अशी जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी पत्तीन सोसायटी, कृषी केंद्र तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये हा विमा स्वीकारला जातो. तेव्हा शेतकऱयांनी विमा भरण्यासाठी पुढे यावे, असे यावेळी कळविण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी कृषी विभागाचे जिल्हा संचालक शिवनगौडा पाटील, उपसंचालक एच. डी. कोळेकर, लिंगराज पाटील यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.