ऑनलाईन टीम/तरुण भारत
मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू(MLA Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana यांच्यात खोक्यांवरून वाद सुरु होते. आमदार राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले होते. या वादावर पडदा टाकण्यासाठी आमदार राणा यांनी बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी रविवारी रात्री दोन्ही ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. तर आज रवी राणा यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यांनतर राणा यांनी बच्चू कडू यांच्याविषयी केलेलं विधान मागे घेत वादावर पडदा टाकला. परंतू, बच्चू कडू यांनीही आपले अपशब्द मागे घेतले पाहिजेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. (Bacchu Kadu and I are together I take my words back Apology expressed by Ravi Rana)
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ‘सागर’ बंगल्यावर चर्चा केल्यानंतर रवी राणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “विचारांमध्ये मतभेद होत असतात. बच्च कडू आणि मी सरकारबरोबर आहे. महाराष्ट्रात जनेतच्या विकास, उन्नती आणि न्याय देण्यासाठी शिंदे-फडणवीस आलं आहे. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी काही विकास केला नाही, तो तीन महिन्यांत या सरकारने केला. त्यामुळे हा विषय मी संपवत आहे. माझ्या वक्तव्यानंतर मंत्री अथवा आमदार दुखावले असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो,” असे रवी राणांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेची मशाल आडवायला कर्नाटकचा तगडा बंदोबस्त
“एकनाथ शिंदे फडणवीस आमचे नेते आहेत. आपले वाद-विवाद अथवा आपण चुकलो तर, दुरुस्त करण्याचं काम नेत्याचं असते. बच्चू कडू यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते आपले अपशब्द मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. वादा-विवादामध्ये आम्हाला पडायचं नाही,” असेही रवी राणांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना राणा म्हणाले, ‘आम्ही दोघेही या सरकारसोबत आहेत. जेव्हा एखाद्या विचारामध्ये मतभेद होते, त्यावेळी बोलता-बोलता तोंडातून हे विधान निघालेले आहे. गुवाहटीच्या संदर्भात असेल किंवा आज मुख्यमंत्री असतील आणि इतर अपक्ष आमदार हे आमचे सहकारी आहेत. त्यामुळे काही वाक्य निघाले असेल, तर मी माझे वाक्य मागे घेत आहे’, अशा शब्दांत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.