जम्मू : खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात घडलेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर पहलगाम आणि बालटाल मार्गावरून ही यात्रा सुरू करण्यात आली. जम्मू प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही मार्गांवर सुरू असलेल्या प्रवासावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी नव्हती. हवामान स्वच्छ झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या देशात सर्वदूर पाऊस सुरू असून काश्मीरमध्येही आता पावसाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. अधून-मधून धुवाधार पाऊस बरसण्याबरोबरच वातावरणातही बदल होत असल्यामुळे अमरनाथ यात्रामार्गात अडथळय़ांचा सामना करावा लागत आहे.
Previous Articleआता भारतीय महिलाही पॉवरफुल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.