ऑनलाईन टीम/तरुण भारत
श्रीलंका (Sri Lanka), नंतर पाकिस्तान (Pakistan) आणि आता बांगलादेश (Bangladesh) आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यन, संपूर्ण जगभरातच महागाईनं कळस गाठला असून मंदीचे काळे ढग दाटले आहेत. श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकट निर्माण झालं आहे. बांगलादेशात याचाचा पहिला परिणाम वाढत्या इंधन दराच्या रुपात पाहायला मिळाला आहे. इंधनाचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
बांगलादेशमध्ये आर्थिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. इथे इंधनाच्या दरात रातोरात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ मानली जात आहे. रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक महागाईची कळ सोसणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांमध्ये इंधन दरवाढीमुळे संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा : कोलकाता येथे सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू
श्रीलंकेतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशची जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून जाळपोळ आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यातच बांगलादेश आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जात बुडाला आहे. बांगलादेशवर आयएमएफच्या ७६२ मिलियन डॉलरच्या कर्जाचा डोंगर आहे. शिवाय गेल्या तीन वर्षात बांगलादेशात विजेचं संकटही गहिरं झालं आहे.