80 रुपये किलोने विक्री, खवय्यांची अंडी, बांगडय़ांना पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी दर भरमसाट वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. सर्रास भाजीपाला 80 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. दरम्यान बांगडय़ांची आवक देखील वाढली असून बांगडे 80 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. त्यामुळे भाजीपाल्यांपेक्षा बांगडे स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसाच्या धुमाकूळमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला कुजून खराब झाल्याने दर वाढले आहेत. दोडकी, कारली, बिनिस, भेंडी, गवार, 60 ते 70 रुपये किलो झाली आहे. एरव्ही 20 रुपयाला चार पेंडय़ा मिळणारी मेथी 25 रुपये पेंडी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान बांगडय़ांची आवक वाढली असून 80 रुपये किलो दराने ते विकले जात आहेत. त्यामुळे खवय्यांकडून अंडी आणि बांगडय़ांना पसंती दिली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात दुचाकीवरून बांगडे विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काय खावे? असा प्रश्न पडत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कचाटय़ात सापडले आहेत. त्यातच भाजीपाल्यांचे दर भरमसाट वाढल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भाजीपाल्यांऐवजी अंडी आणि बांगडे खरेदी करताना दिसत आहेत. बांगडय़ांचे दर आवाक्मयात असल्याने खरेदीकडे कल वाढला आहे.