प्रतिनिधी/ सातारा
शहराच्या काही भागाला महादरे तळ्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी मे महिन्यापर्यंत हे तळे सुस्थितीत असताना यावर्षी 15 फेब्रुवारीलाच तळे रिकामे झाले. या तळ्याचा व्हॉल्व्ह कोणी सोडून तळ्यातील पाणी सोडून दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांने पालिकेत तसा अर्ज दिल्याचे समजते. दरम्यान, तो व्हॉल्व्ह सोडणारा अज्ञात व्यक्ती कोण?, आजपर्यंतच्या इतिहासात कधीही असा प्रकार झालेला नव्हता. नुकताच उन्हाळा सुऊ झालेला असून नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
पालिकेच्या निवडणुका लागण्यापूर्वी प्रत्येक पेठेत, प्रत्येक वॉर्डात राजकारण पेटू लागले आहे. तसेच राजकारण व्यंकटपुरा, चिमणपुरा, केसकर कॉलनी परिसरात पाण्याचे राजकारण सुऊ झालेले आहे. या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या महादरे तळ्याची पाणी पातळी एकदम तळ्यात गेलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाला ही अवस्था असून अजून तीन महिने उन्हाळ्याचे सातारकरांना काढावे लागणार आहेत. असे असताना महादरे तळ्यातील पाण्याची स्थिती नेमकी कशी झाली. याबाबत उलटसुलट चर्चा सुऊ असून पालिकेच्या कर्मचाऱ्याने अज्ञाताने व्हॉल्व्ह सोडून दिल्याचे पत्र दिले आहे.
दरम्यान, तो व्हॉल्व्ह कोणी सोडला आहे. तसेच त्या तळ्याच्या परिसरात कोणीही नसते. सायंकाळीच नव्हे तर दिवसा कधीही या तळ्याच्या परिसरात मद्यपींचा वावर असतो. तळ्याच्या आजुबाजुला दाऊच्या बाटल्याचा खच पडलेला पहायला मिळतो. या परिसरात ओल्या दाऊच्या पार्ट्या दिवसा आणि सांयकाळी सुऊ असतात. त्यामुळे तळ्याला कोणी वालीच नसल्याची अवस्था आहे. त्यामुळे महादरे तळ्याची उद्भवलेली परिस्थिती नेमकी प्रशासन परिस्थिती कशी हाताळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
माजी नगरसेवक अविनाश कदम यांना दिले होते आश्वासन
पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबीनमध्ये व्यंकटपुरा पेठेतल्या नागरिकांनी माजी नगरेसवक अविनाश कदम यांच्या नेतृत्वाखाली जावून विचारणा केली होती. बापट यांनी आश्वासन दिले होते. हा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन होण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा वर्षात असे कधी झाले नव्हते
मी लहानपणापासून पहात आलो आहे. असे कधीच झाले नव्हते. गेल्या सहा वर्षात महादरे तळ्यात पाणी मे, जुनपर्यंत असायचे. गाळ काढल्यानंतर असे झाले नव्हते. सगळे गौडबंगाल आहे.