घरातील तिन्ही व्यक्ती सुरक्षित
कणकवली /प्रतिनिधी-
काल रात्रीपासून तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बावशी येथील सत्यवान मर्ये यांचे राहते घर कोसळले. त्यांचे दोन लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या धुवांधार पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
दरम्यान श्री मर्ये यांच्या घरात तीन व्यक्ती होत्या. त्यांना लगतच्या घरात स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जाणवली नदीचे पाणी वरवडे फणसनगर भागात रस्त्यावर आल्याने आचरा मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.