ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. यामुळे तब्बल ९०० पुरुष आणि महिला क्रिकेटपटू तसेच सामना अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या घोषणेनंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly)यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जय शाह (Jay Shah)यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माजी क्रिकेटपटू आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. जवळपास ९०० लोकांना याचा लाभ होणार आहे. ज्यांना पेन्शन मिळत आहे, त्यापैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना १०० टक्के पेन्शन वाढीचा लाभ घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावर सौरभ गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- वटपोर्णिमेला हेमांगीची पोस्ट व्हायरल; म्हणाली,उपवास करण्यापेक्षा…
सौरव गांगुली म्हणाले की, आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर त्यांची काळजी घेणे ही बोर्ड म्हणून आमची जबाबदारी आहे. बीसीसीआयला त्यांचे योगदान चांगल्या रीतीने समजते असेही ते म्हणाले.